शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता! उन्हाळ्यात टाळा उष्माघात, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 09:34 IST

भरउन्हात महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर जवळपास ६०० नागरिकांना उष्माघाताचा त्रास तर १२ हून अधिक नागरिकांचा मृत्यू

पुणे : आपल्या शरीराचे नाॅर्मल तापमान हे ३७ अंश डिग्री सेल्सिअस इतके असते; परंतु जर त्यापेक्षा ते वाढले तर घाम येताे आणि थरीर थंड होण्याची प्रक्रिया सुरू होते; परंतु शरीरातील पाणी संपले तर घाम येणे बंद हाेऊन ताेंडाला काेरड पडून उष्माघाताची शक्यता वाढते. त्यासाठी उन्हात जाताना काही गाेष्टींची काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

खारघरमध्ये भरउन्हात महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर जवळपास ६०० नागरिकांना उष्माघाताचा त्रास झाला व त्यापैकी १२ हून अधिक नागरिकांचा मृत्यूही झाला. बहुतेकांनी उन्हातून आल्यावर थंड पाणी पिल्यानंतर त्यांना हा त्रास झाला असे बाेलले जात आहे. यावरून उष्माघात किती जीवघेणा ठरू शकताे, ही बाब समाेर आली आहे. म्हणून या उन्हाळ्यात जर स्वत:चा बचाव करायचा असेल तर काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे डाॅक्टर सांगतात.

यंदा मार्च महिन्यापासूनच राज्यात उष्णता वाढली आहे. राज्यातील सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस व त्यापुढे जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे उष्माघाताचे रुग्णही वाढले आहेत. राज्यात मार्च ते १३ एप्रिलदरम्यान उष्माघाताचे ३५७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक संशयित रुग्ण मुंबई उपनगर, नंदुरबार आणि उस्मानाबाद येथील आहेत, तर पुण्यातील दाेन संशयित रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसला तरी ही बाब गंभीर आहे. राज्याच्या साथराेग विभागाने ही माहिती दिली आहे.

काय काळजी घ्याल?

- वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे टाळावे.

- उष्णता शोषूण घेणारे कपडे घालावेत.- सावलीत बसून भरपूर पाणी प्यावे.

जाेखीम काेणाला?

- ६५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती- ० ते ५ वर्षे वयोगटातील मुले, गर्भवती माता, मधुमेह, हृदयविकाराचे रुग्ण- अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती यांना उष्माघाताची जाेखीम आहे.

कारणे 

- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे- कारखान्यांच्या बॉयलर रूममध्ये काम करणे- काच कारखान्यातील कामे- घट्ट कपड्यांचा वापर

लक्षणे 

- पुरळ/घामाेळे- उष्णतेने स्नायूमध्ये पेटके येणे- पाय, घोटा आणि हातांना सूज- थकवा येणे, बेशुद्ध होणे

उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता

शरीराचे तापमान जर ३६.८ अंश सेल्सिअसच्यापुढे गेले तर शरीरातील इतर क्रियांवर परिणाम हाेताे. जर हे तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले, तर मग मेंदूतील तापमान नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेवर परिणाम हाेताे. यावेळी घाम येऊन शरीरातील पाणी संपले, तर मग लघवी बंद हाेते. डाेळ्यापुढे अंधारी येते, मेंदूचा रक्तपुरवठा मंदावताे. अशावेळी उष्माघात हाेऊन वेळेवर उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता वाढते. - डाॅ. अविनाश भाेंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यTemperatureतापमानWaterपाणीHeat Strokeउष्माघात