शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Sharad Pawar: चंद्रशेखर राव यांचा बीआरएस महाराष्ट्र शरद पवार गटात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 12:27 IST

लोकसभा निवडणुकीआधी चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते

पुणे : भारत राष्ट्र समिती या तेलंगणामधील पक्षाची महाराष्ट्र शाखा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात विलीन करण्यात आली. बीआरएसचे महाराष्ट्र प्रभारी, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तशी घोषणाच रविवारी केली.

मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रविवारी दुपारी हा कार्यक्रम झाला. शरद पवार, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, हरिभाऊ राठोड व बीआरएस पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. सर्वांचा सन्मान ठेवला जाईल असे राठोड व सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीआधी चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते. पंढरपूरमध्ये त्यांनी ६०० गाड्यांचा ताफा आणून महाराष्ट्रात राजकीय हवा केली होती. मात्र, तेलंगणा विधानसभेतील पराभवाने महाराष्ट्रातही या पक्षाला घरघर लागली आहे.

 राज्यात प्रवेश झालेल्या तेलंगणा येथील भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये विलिनीकरण होणार असल्याची चर्चा होती. या पक्षाच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांनी पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. अखेर ६ ऑक्टोबरला पवार यांच्याच उपस्थितीत राज्यातील या पक्षाचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाचा काँग्रेसकडून सपशेल पराभव झाला. त्यामुळे त्यांची तेथील हवा गेली. त्यानंतर राज्यातील त्यांच्या पक्षाची चर्चाही बंद झाली. पंढरपूर येथील काही नेते त्यांच्या पक्षात गेले होते. राज्यात पक्षाचे संघटन वाढावे, यासाठी त्यांनी काही पावलेही उचलली होती. सर्व पदाधिकाऱ्यांसह पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावTelanganaतेलंगणाNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभा