शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

लोकसहभागातून सहा महिन्यांत गावाचा कायापालट

By admin | Published: January 26, 2016 1:37 AM

भारताच्या प्रजासत्ताकाला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अनेक गावे मूलभूत सेवासुविधांपासून आजही कोसो दूर आहेत. ग्रामीण भागातील लोकांना विकासाची फळे आजही

विलास भेगडे,  तळेगाव दाभाडे भारताच्या प्रजासत्ताकाला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अनेक गावे मूलभूत सेवासुविधांपासून आजही कोसो दूर आहेत. ग्रामीण भागातील लोकांना विकासाची फळे आजही चाखता आलेली नाहीत. खासदार आणि आमदारांनी गाव दत्तक घेऊन विकास करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी केले होते. त्यानुसार अनेक खासदार, आमदारांनी आपापल्या सोईची गावेही दत्तक घेतली. परंतु त्यांचा विकास कितपत झाला हे गुलदस्तात आहे. त्या पार्श्वभूमीवर सुनील शेळके यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकासासाठी केलेल्या आवाहनापासून प्रेरणा घेत मावळच्या अत्यंत दुर्गम भागातील डोणे गावाचा कायापालट केला आहे.‘लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठाना’च्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी लोकश्रमदानातून मावळ तालुक्याच्या डोंगरी भागातील डोणे या गावाचा थक्क करणारा कायापालट केवळ सहा महिन्यांत केला आहे. त्यामुळे बाराशे लोकसंख्येच्या गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ग्रामविकासाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.शेळके म्हणाले, ‘‘गोपीनाथ मुंडे यांच्या ग्रामीण विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी प्रतिष्ठानाने पहिला लक्षवेधी उपक्रम हाती घेतला. त्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली. प्रतिष्ठानाने खर्चाची पर्वा न करता या गावांचा विकास करण्याचा निर्धार साकार झाला आहे. त्यासाठी माझे सहकारी आणि गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतली. गावविकास करताना गावात चार किमी लांबीचे सिमेंट कॉँक्रीटचे रस्ते, दोन किमीचा पक्का डांबरी रस्ता, १६ शौचालये, मंदिर आणि शाळेच्या इमारतींचे विकासकाम, प्रत्येक घरासमोर पाण्याचा नळ, संगणकयुक्त ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत, स्मशानभूमीचे सुशोभीकरणआणि विकास करता आला आहे. डोणेगावचे सरपंच संभाजी कोंडे, बाळासाहेब घोटकुले, संजय बाविस्कर, तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घारे, बाबूराव आरोटे, किसन घारे, सोपान कारके, बाबूराव चांदेकर, शिवलिंग कुंभार, नामदेव कोंडे, तुकाराम लांडगे, शेखर काळभोर, राहुल खिलारे, अंकुश घारे यांच्यासह युवा कार्यकर्ते, ग्रामस्थांनी सहभाग घेतला. गावकरी आणि महिलांनी श्रमदान केल्याने या विकासाला वेगळेच महत्त्व आहे. आमदार, खासदारांना जमले नाही, ते साध्या कार्यकर्त्याने करून दाखविल्याने सामाजिक कार्य करणाऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.सरपंच कोंडे म्हणाले, की प्रतिष्ठानाने हे गाव दत्तक घ्यावे म्हणून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी लेखी मान्यता दिली. तळ्याच्या विकासामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रथमच कायमस्वरूपी मार्गी लागल्याने महिलांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. प्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांनी आता पुढचा संकल्प हाती घेतला आहे. आगामी काळात प्रत्येकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, जनधन आणि विमा योजनांची खाती आणि शासकीय योजनांचा लाभ शेतकरी कुटुंबांना घेता यावा म्हणून आवश्यक असलेली कागदपत्रे गावकऱ्यांना मिळवून देण्याचे कामही सुरू झाले आहे. गावात ग्रंथालय आणि युवकांना करिअरसाठी मार्गदर्शन मिळेल, असे केंद्र उभारण्याचा प्रतिष्ठानाचा मानस आहे. (वार्ताहर)