शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले... अयोध्याप्रकरणी भगवंताकडे प्रार्थना केली आणि मार्ग निघाला

By नितीश गोवंडे | Updated: October 21, 2024 08:54 IST

पुण्याच्या खेड तालुक्यातील वडिलाेपार्जित वाड्याला दिली भेट; जुन्या आठवणींना उजाळा

नितीश गोवंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: अनेकदा न्यायालयात काम करताना एखाद्या प्रकरणावर काेणते उपाय सूचवावेत हे आपल्याला सूचत नाही. ज्यावेळी अयोध्येचे काम माझ्यापुढे आले होते, त्यावेळी ३ महिने आम्ही अयोध्येच्या कामावर विचार करत होतो. शेकडो वर्षे ज्यावर कुणी उपाय काढला नाही ते काम आमच्यापुढे आले. हे काम सुरू असताना यातून मार्ग कसा शोधायचा हे कुणालाही माहीत नव्हते. मी दैनंदिन जीवनात दररोज पूजा करतो, त्यामुळे मी भगवंतासमोर बसलो आणि त्यांनाच यातून मार्ग शोधून द्या, अशी प्रार्थना केली. मनात आस्था असेल तर मार्ग नेहमी निघतो असे मला वाटते, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

रविवारी सरन्यायाधीश त्यांच्या मूळ गावी खेड तालुक्यातील कनेरसर येथे असताना त्यांचा नागरी सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. ए. एस. सय्यद, न्या. एस. बी. पोळ, न्या. एस. बी. पवार, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे आदी उपस्थित होते.

देवीच्या कृपेमुळे मी सरन्यायाधीश झालो

गावातील यमाई देवीच्या कृपेमुळे मी सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो, असे मला कायम वाटते. कनेरसर गावासोबतचे माझे नाते लहानपणापासून आहे, या शब्दांत चंद्रचूड यांनी भावना व्यक्त केल्या.

जंगी स्वागत, रमले कुटुंबीयांत

राजगुरूनगर : सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मूळ गावी कनेरसर (ता. खेड) येथे कुटुंबीयांनी, तसेच गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. जुन्या वाड्यात चंद्रचूड सुमारे पाऊणतास कुटुंबीयांसमवेत रमले होते. गावात व रस्त्यावर स्वागताचे फलक झळकत होते. सर्व कुटुंबीय स्वागतासाठी वाड्याच्या मुख्य दरवाजासमोर उभे होते. वाड्यात रांगोळी काढून तोरण लावून वाडा सजला होता.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडPuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर