शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

Jayant Patil: "मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला", जयंत पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 17:00 IST

महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे, जातनिहाय जनगणना करणे याचा महाविकास आघाडीच्या विकासाच्या पंचसुत्रीत समावेश असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले

जुन्नर: केंद्र शासनाने महाराष्ट्राला सातत्याने दुजाभावाची वागणुक दिली आहे. महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला नेले आहेत. भाजप व मित्रपक्षाने महागाई वाढवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला असल्याची टीका जयंत पाटील यांनी जुन्नर येथे केली. महविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 

पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य घरात घरखर्च करण्याची समस्या भेडसावत आहे. देशात चुकीची राजनीती व आर्थिक नीती सुरू आहे.  .जीएसटी मुळे साध्या जीवनावश्यक गोष्टी देखील महागल्या आहेत. राज्य शासन केंद्र शासनाला जाब विचारू शकत नाही. महायुतीचे राजकारण केवळ लाडक्या खुर्चीसाठी चालले आहे. महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे, जातनिहाय जनगणना करणे याचा महाविकास आघाडीच्या विकासाच्या पंचसुत्रीत समावेश असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

त्यांच्या उपकाराची जाणीव पक्ष ठेवणार 

 शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन मोठा त्याग केला आहे. तसेच ज्येष्ठ नेते शरद लेंडे, अंकुश ढमाले यांनी केलेल्या त्यागाची, उपकाराची जाणीव पक्ष ठेवणार आहे. पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. यासाठी त्यांचे मी आभार मानायला आलो आहे . अशी कृतज्ञता जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

आता खासदार कोल्हे व सत्यशील शेरकर ही नवीन जोडी

आदीवासी समाजातील कृष्णराव मुंडें यांना शरद पवार यांनी जुन्नर तालुक्याचे आमदार केले . आदिवासी समाजाला जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद असेही जयंत पाटील यांनी सांगितले. पुर्वी जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे व इथले आमदार यांची जोडी होती. ही जोडी आताही एकत्र आहे असे प्रचारात सांगितले जाते. परंतु शरद पवार ,खासदर कोल्हे यांच्यावर टीका केल्याने ही जोडी आता तुटली आहे. आता खासदार कोल्हे व सत्यशील शेरकर ही नवीन जोडी लोकांनी केली आहे. जोड्या लावायला व जोड्या तोडायला लोक हुशार आहे अशी टीप्पणी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

साहेबांच्या आशीर्वादाने विजय निश्चित 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचा आशीर्वाद असल्याशिवाय जुन्नर तालुक्यात निवडणूक लढवता येत नाही .सद्यस्थितीत पवार साहेबांचा आशीर्वाद सत्यशील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसjunnar-acजुन्नरSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीInflationमहागाई