शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
3
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
4
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
5
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
6
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
7
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
8
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
10
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
11
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
12
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
13
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
14
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या
15
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
16
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
17
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
18
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
19
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
20
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल

विम्यासाठी एकत्रित विचार न करता वर्गीकरण करावे, रिक्षा व्यावसायिकांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: प्रवासी वाहनांच्या विम्याचा एकत्रित विचार न करता त्यांचे वर्गीकरण करावे व त्यानुसारच त्यांचा वार्षिक हप्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: प्रवासी वाहनांच्या विम्याचा एकत्रित विचार न करता त्यांचे वर्गीकरण करावे व त्यानुसारच त्यांचा वार्षिक हप्ता ठरवावा, असा आदेश भारतीय विमा नियमन प्राधिकरणाने सन २०१५ मध्ये दिला आहे. विमा कंपन्या या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याने रिक्षा व्यावसायिकांवर अन्याय होत आहे.

रिक्षा, टॅक्सी व मोठ्या बस यांचा विमा उतरवणे कायद्याने बंधनकारक आहे. विमा कंपन्या त्यांच्या अपघात विम्याचे हप्ते वेगवेगळे घेत असले तरी अपघातांचा व त्यानंतर मागणी होत असलेल्या विम्याच्या प्रकरणांचा एकत्रित विचार करतात. वर्षाला सर्व वाहनांचे एकूण अपघात किती झाले, यावरून ते विम्याचा वार्षिक हप्ता निश्चित करतात. प्रत्येक कंपनीची हीच पद्धत आहे.

प्रत्येक विमा कंपनीच्या खातेदारांच्या एकूण वार्षिक अपघातांच्या संख्येत रिक्षांच्या अपघातांचे प्रमाण एकदम कमी आहे. प्रवासी बसचे अपघात सर्वात जास्त होतात. त्यात भरपाईही जास्त द्यावी लागते. विमा कंपन्या प्रवासी वाहनांच्या अपघातांचा एकत्रित विचार करण्यामुळे अपघातांची संख्या कमी असूनही रिक्षाच्या अपघात विम्याच्या वार्षिक हप्त्यात दर वर्षी वाढ होते.

भारतीय विमा नियमन प्राधिकरणाने सन २०१५ मध्ये विमा कंपन्यांनी असा एकत्रित विचार न करता वाहननिहाय विचार करावा व त्यावरून विम्याचा वार्षिक हप्ता ठरवावा, असा आदेश काढला आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यात विमा कंपन्यांचा आर्थिक फायदा होतो मात्र सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रकारात तळाशी असलेल्या रिक्षा व्यावसायिकांचे मात्र नुकसान होत आहे.

आम आदमी रिक्षा संघटनेने प्राधिकरणाच्या हैद्राबाद येथील मुख्यालयाकडे याबाबत दाद मागितली आहे. मात्र, प्राधिकरण फक्त त्या आदेशाकडे बोट दाखवते, त्याचे पालन न करणाऱ्या विमा कंपन्यांवर कारवाई करण्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे असे संघटनेचे म्हणणे आहे. अन्य प्रवासी वाहनांच्या तुलनेत उत्पन्न तसेच क्षमता या सर्वच बाबतीत रिक्षा व्यावसायिक कमी आहेत, विमा कंपन्यांच्या या प्राधिकरणाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रकाराचा गेली अनेक वर्षे त्यांना त्रास होतो आहे. आदेशाचे पालन झाले तर रिक्षा व्यावसायिकांना सध्या असणाऱ्या विम्याच्या वार्षिक हप्त्यात घट होईल असे संघटनेचे म्हणणे आहे.