शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

बेकायदा कचरा प्रकल्प बंद करा

By admin | Published: March 27, 2017 3:19 AM

बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मान्यता देण्यात आलेला नोबेल

बाणेर : बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मान्यता देण्यात आलेला नोबेल एक्स्चेंज एन्व्हायर्नमेंट सोल्युशन कंपनीचा बाणेर येथील पालिकेच्या मालकीच्या जागेतील बेकायदेशीर कचरा प्रकल्प प्लांट पालिकेने तातडीने बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.महापालिका आयुक्त कुणाल कुमार, कोथरूड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, ्नराहुल कोकाटे यांनी या प्रकल्पाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांनी या प्लांटमुळे होणाऱ्या त्रासाची गाऱ्हाणी मांडली. प्लांटमुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच प्लांटमधून कार्बनडाय आॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन सल्फाईड हे घातक वायू बाहेर पडत असल्यामुळे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या कंपनीला या ठिकाणी फक्त कचरा विलगीकरणाची परवानगी असून, स्लरी डेव्हलपमेंट प्रोसेससाठी तळेगाव या ठिकाणची मान्यता असल्याचे माहिती अधिकारातून समोर आल्याचे नागरिकांनी या वेळी सांगितले. तसेच या ठिकाणी अनेक महिला कामगार काम करत असून, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. हा प्लांट म्हणजे चॉकलेटची फॅक्टरी नाही, वास येणारच, एवढ्या वासाने कोण मरणार आहे, अशी उद्धट उत्तरे पालिका व कंपनीचे अधिकारी देत असल्याचे या वेळी नागरिकांनी सांगितले. (प्रतिनिधी)शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उभारलेले पूर्वीचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसताना आणखी एक हजार ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी २०१४मध्ये या कंपनीला मान्यता देण्यात आली. त्या वेळी पालिकेत भाजपाने विरोधी भूमिका घेतल्याने ४७ विरुद्ध ९ मताने हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरणारा हा प्रकल्प असून, तो तातडीने बंद करण्यासाठी प्रयत्नशील राहू. - मेधा कुलकर्णी, आमदार या प्लांटमुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब मान्य आहे. येत्या दहा दिवसांत या प्लांटसंदर्भात नागरिकांचे हित लक्षात घेऊन व सर्व कायदेशीर बाबी तपासून अंतिम निर्णय आम्ही घेऊ.- कुणाल कुमार, आयुक्त, महापालिकासंबंधित प्रकल्पाला भेट देण्यासाठी स्थानिक आमदार, पालिका आयुक्त येणार असल्याची साधी कल्पनाही या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून देण्यात आली नाही. या प्लांटमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, ही वस्तुस्थिती असून या प्लांटचे स्थलांतर व्हावे ही आमची आग्रही भूमिका आहे. केंद्रात, राज्यात व पालिकेत भाजपाची सत्ता असल्याने ते हा प्रकल्पाचे निश्चित स्थलांतर करतील, अशी आशा आहे.- बाबूराव चांदेरे, नगरसेवकवीजनिर्मितीच्या नावाखाली पालिकेची चक्क फसवणूक सुरू आहे. या प्रकल्पातून किती वीज, गॅसनिर्मिती झाली हे प्रशासनाने जाहीर करावे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारताना या प्रकल्पाचा आराखडा तयार करणे आवश्यक होते. या प्रकल्पाची पर्यावरण, आर्थिकदृष्ट्या छाननी केली गेली नाही. भरवस्तीमध्ये हा प्रकल्प उभारला गेला आहे.- अमोल बालवडकर, नगरसेवक