शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी अडचणीत , पाणी बंद केल्याने शंभर जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 17:12 IST

पुनर्वसन व इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेले प्रकल्पबाधित शेतकरी कायदेशीर अडचणीत सापडले आहे.

ठळक मुद्देशासकीय कर्तव्य पार पाडण्यास अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद

खेड : भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी जबरदस्तीने बंद केल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून भामा आसखेड सिंचन व्यवस्थापनच्या उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे.त्यामुळे तब्बल शंभर जणांवर चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.७) रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  पुनर्वसन व इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेले प्रकल्पबाधित शेतकरी कायदेशीर अडचणीत सापडले आहे. परंतू, पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न दिसत आहे.भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उप-विभाग करंजविहीरेचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे (वय ५८,रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली) यांनी या बाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार सत्यवान नवले, बळवंत डांगले, गणेश जाधव, सचिन डांगले, तुकाराम नवले, निवृत्ती नवले, किसन बळवंत डांगले, हिरामण शिवेकर, तुकाराम शिंदे, दत्तू शिंदे, रमेश आवळे, दतात्रेय शिंदे, अनिल देशमुख, मल्हारी शिवेकर,अण्णा देव्हाडे, गणेश नवले , प्रकाश जाधव, लक्ष्मण नवले, नामदेव बांदल या एकोणीस जणांसह अन्य ८० ते १०० जणांवर भा. दं. वि. कलम ३५३, ४५२, १४१, ४३, १४७, १४९, ५०६ मु.पो.का. कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.उपविभागीय अधिकारी मेमाणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. की, भामा आसखेड धरणातील पाणी सोडण्यास परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र, या धरणातील पाणी सोडण्याच्या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानंतर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.६) सकाळी अकराच्या सुमारास या सुमारे ८० ते १०० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी संगनमताने करंजविहीरे येथील कार्यालयात जबरदस्तीने येऊन अधिकाऱ्यांना धमक्या व दमबाजी सुरु केली. आमचे पुनर्वसन झालेले नाही. आम्हाला पर्यायी जमिनी मिळालेल्या नाही. अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. ते प्रश्न सुटल्याशिवाय धरणातून एक थेंबही पाणी आम्ही सोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी कार्यालयात जबरदस्तीने घुसून भामा आसखेड धरणाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे,अभियांत्रिकी सहायक केरू दगडू पांडे, वरिष्ठ लिपिक प्रवीण वाळेकर, तानाजी गौड, बाबाजी गरुड यांना धमक्या देऊन आणि दमबाजी करून बळजबरीने धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यास भाग पाडले. सर्वांनी संगनमताने शासकीय कर्तव्य पार पडण्यास अडथळा निर्माण केल्याचे अधिकारी मेमाणे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :KhedखेडDamधरणChakanचाकणPoliceपोलिसCrimeगुन्हाFarmerशेतकरी