शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

पुणे शहरातील आरक्षण बदलाबाबत आमदार गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 16:43 IST

सामाजिक व शहराचे हित लक्षात घेऊनच आरक्षण बदलाबाबत निर्णय घ्यावा : निलम गोऱ्हे

ठळक मुद्देकधी पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे तर कधी रस्त्याच्या आखणीचे कारणे देत ही प्रक्रिया सुरूमंजूर करण्यात आलेल्या विकास आराखड्यात बदल करणे व तेही आरक्षणात हे अत्यंत अयोग्य

पुणे : शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील कोथरूड, बाणेर, मुंढवा येथील आरक्षणे बदलली जात असल्याबद्दल आमदार निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा केली आहे. कोथरूड, बाणेर, मुंढवा ही शहराची उपनगरे आहेत. कोथरूड हे तर आता शहराचे केंद्रस्थान होत चालले आहे. तिथे  शाळा, मैदाने, दवाखाने, उद्याने यांची आत्यंतिक गरज आहे. हे लक्षात घेऊनच उद्यान, अग्निशमन केंद्र, प्राथमिक शाळा यासाठी आरक्षणे ठेवण्यात आली होती. आता काही ना काही कारणे दाखवून ही आरक्षणे रद्द करण्याचा प्रयत्न होत असल्याचे गोऱ्हे यांनी नमूद केले आहे. विधानसभेच्या अधिवेशनात याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, तसेच या तिन्ही क्षेत्रातील आरक्षणे उठवण्याबाबत प्रक्रिया सुरू केली गेली असल्याचेही दिसते आहे. कधी पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे तर कधी रस्त्याच्या आखणीचे अशी कारणे देत ही प्रक्रिया सुरू केली आहे. हरकती सूचना यांची सुनावणी घेऊन मंजूर करण्यात आलेल्या विकास आराखड्यात बदल करणे व तेही आरक्षणात हे अत्यंत अयोग्य असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.सामाजिक हिताबरोबरच शहराचे हित सुध्दा लक्षात घेणे गरजेचे आहे. पुरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी अन्य जागा मिळू शकते. राज्य सरकार त्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकते. रस्त्याची आखणी करणेही सरकारच्याच अखत्यारीतील गोष्ट आहे. त्यांना विरोध नाही, मात्र त्यासाठी आरक्षणात बदल करणे चुकीचे आहे. त्यामुळे सामाजिक व शहराचे हित लक्षात घेऊनच आरक्षण बदलाबाबत निर्णय घ्यावा, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेNeelam gorheनीलम गो-हेShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिनGovernmentसरकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका