शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

पुणे विमानतळावर गोंधळ! ‘एअर इंडिया हाय हाय...’, दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 10:32 IST

एअर इंडियाच्या डेकसमोर बसून प्रवाशांनी ‘एअर इंडिया हाय हाय’ अशा घोषणा दिल्या.....

पुणे : दिल्ली विमानतळावर छप्पर कोसळून दुर्घटना झाल्यामुळे लोहगाव विमानतळावरून शुक्रवारी सकाळी ६:४० मिनिटांनी जाणारे पुणे- दिल्ली एअर इंडियाचे विमान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कोणतीही पूर्वसूचना न देता विमान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. एअर इंडियाच्या डेकसमोर बसून प्रवाशांनी ‘एअर इंडिया हाय हाय’ अशा घोषणा दिल्या.

लोहगाव विमानतळावरून शुक्रवारी सकाळी ६:४० वाजता एअर इंडिया एक्स्प्रेसचे पुणे ते दिल्ली विमान उड्डाण करणार होती; परंतु दिल्ली विमानतळावर दुर्घटना झाल्यामुळे दिल्लीवरून पुण्याला येणारी विमान रद्द झाली होती. तेच विमान पुन्हा दिल्लीकडे जाणार होते; परंतु विमान न आल्यामुळे दिल्लीकडे जाणारे विमान रद्द करण्यात आले. याबाबत प्रवाशांना ऐन वेळी सांगण्यात आले. सकाळी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. ऐन वेळी विमान रद्द झाल्यामुळे गैरसोय झाली. त्यामुळे उपस्थित प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

दिल्लीला जाणारे प्रवासी प्रकाश सोनावणे यांनी सांगितले, की विमान रद्द झाल्याचे प्रवाशांना ऐन वेळी सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. एअरलाइन व्यवस्थापनाला आधीच सर्व माहिती असते, तरीही त्यांनी विमान रद्द झाल्याची पूर्वसूचना प्रवाशांना दिली नाही. एअर इंडिया एक्स्प्रेसचे कर्मचारीही प्रवाशांना नीट उत्तरे देत नसल्याने संतापाची भावना आहे.

 

टॅग्स :pune airportपुणे विमानतळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAir Indiaएअर इंडिया