शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

साखर उद्योगाबाबत ऐतिहासिक निर्णय, अमित शाहंचे दिल्लीत जाऊन अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 22:06 IST

सन 1958 पासून प्रश्न होता प्रलंबित

ठळक मुद्देसन 2016 पासून प्रतिकाराचा आदेश लागू होणार असला तरी साखर कारखान्यांना यापूर्वी दिलेल्या सर्व नोटिसा मागे घेण्यात याव्यात, अशी विनंती देवेंद्र फडणवीस व रावसाहेब दानवे यांनी सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे या भेटीत केली.

बारामती/पुणे : केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडून दिला जाणारा एफआरपी किंवा एमएसपीपेक्षा अधिकचा दर हा ऊस खरेदीचा खर्च समजावा व त्यावर प्राप्तिकर आकारू नये, असा कायद्यात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या भाजप नेत्यांनी नवी दिल्ली येथे बुधवारी अभिनंदन करून सत्कार केला.

साखर उद्योगाला सुमारे 8 हजार कोटींहून अधिक रक्कमेच्या वसुलीसाठी प्राप्तिकराच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. सन 2016 पासून प्रतिकाराचा आदेश लागू होणार असला तरी साखर कारखान्यांना यापूर्वी दिलेल्या सर्व नोटिसा मागे घेण्यात याव्यात, अशी विनंती देवेंद्र फडणवीस व रावसाहेब दानवे यांनी सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे या भेटीत केली. त्यामुळे या नोटीसांसंदर्भात निश्चितपणे मार्ग निघेल, अशी माहिती माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.            केंद्र सरकारने साखर कारखान्यांना प्राप्तिकरातून वगळावे, यासंदर्भात विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अमित शाह यांची 19 ऑक्टो. रोजी नवी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, या प्रश्नासंदर्भात भेटीनंतर केवळ चार-पाच दिवसातच अमित शाह यांनी साखर उद्योगाला प्राप्तिकरासंदर्भात सवलत देणारा आदेश काढला. त्यामुळे महाराष्ट्र व देशातील साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. साखर उद्योगापुढील प्रतिकाराचा प्रश्न हा सन 1958 पासून प्रलंबित होता. तसेच या भेटीत अमित शहा यांचे बरोबर साखर उद्योगासंदर्भातील इतर अडचणीवरही चर्चा करण्यात आली. या अडचणी सोडविण्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शाह हे अतिशय सकारात्मक असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस