शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

‘भारत जोडो’ द्वारे काँग्रेसचा पुनर्जन्म होणार; डॉ. गणेश देवी यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 15:47 IST

आजचा अंधार दूर होऊन उद्याची पहाट उजाडणार

पुणे : सामाजिक, राजकीय आणि अध्यात्मिक उद्देशाने काढण्यात येत असलेल्या ‘भारत जोडो’द्वारे काँग्रेसचा पुनर्जन्म होईल, असा विश्वास गांधीवादी ज्येष्ठ विचारवंत व भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला. आजचा अंधार दूर होऊन उद्याची पहाट उजाडणार आहे, असेही ते म्हणाले.

डाॅ. देवी म्हणाले की, एकशे दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांनी अहमदाबादपासून गदगपर्यंत झंझावाती प्रवास केला. त्यात त्यांना काही नवीन अनुयायी मिळाले. त्यावेळी गांधीजींचे वय होते ५२ वर्षे. याच वयात राहुल गांधी देशातील द्वेषाचे वातावरण संपविण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम करीत आहेत.सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत 'भारत जोडो' पदयात्रेतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. देवी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

लढा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देशाला काँग्रेस बनायला पाहिजे

इंग्रज देशावर राज्य करीत होते, तेव्हा त्यांच्याविरूद्ध लढणाऱ्या एका सामाजिक संघटनेचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्या संघटनेचे नाव ‘काँग्रेस’. समाजात निर्माण झालेले तणाव, आरएसएसचे दुफळी माजवणारे धोरण, भाजपच्या समाज तोडण्याच्या विघातक प्रवृत्तीमुळे समाजाचे विघटन होत आहे. ते कमी करून समाजाला एकत्र आणण्यासाठी भारत जाेडाे यात्रा काढली जात आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देशाला काँग्रेस बनायला पाहिजे, असेही डाॅ. देवी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा