शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

कार्यकर्तेच दाखवतील काँग्रेसला पुन्हा ‘अच्छे दिन ’ : सोनल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 21:29 IST

तळागाळात काम करणारा कार्यकर्ता ही काँग्रेसची खरी शक्ती आहे. त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष झाले होते, त्याचा तोटा काँग्रेसला झाला...

ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्रात चांगले संघटनपक्षाच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार

पुणे : तळागाळात काम करणारा कार्यकर्ता ही काँग्रेसची खरी शक्ती आहे. त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष झाले होते, त्याचा तोटा काँग्रेसला झाला, मात्र आता ते पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आले असून थेट अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडूनच तळातील कार्यकर्त्यांना शक्ती देण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेले १५ दिवस पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. त्यात अनेकांबरोबर संवाद झाला आहे व पक्ष पुन्हा चैतन्याने संघटीत होईल असा विश्वास काँग्रेस कमिटी नियुक्त पश्चिम महाराष्ट्राच्या निरीक्षक सोनल पटेल यांनी लोकमत बरोबर बोलताना व्यक्त केला.काँग्रेस महासमितीने पटेल यांची पश्चिम महाराष्ट्राकरता निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गेले पंधरा दिवस त्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘काँग्रेस खरी मोठी झाली ती कार्यकर्त्यांमुळेच. नेत्यांनी दिलेली दिशा कार्यकर्तेच तळापर्यंत पोहचवतात. स्वातंत्र्यलढ्यापासून व नंतरही दीर्घकाळपर्यंत ही प्रक्रिया पक्षात सुरू होती. मात्र गेल्या काही वर्षात काही कारणांनी त्यात खंड पडला. कार्यकर्ता दुर्लक्षित झाला. आता मात्र असे होणार नाही. पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्या लक्षात ही त्रुटी आली आहे. त्यामुळेच त्यांनी देशाच्या सर्व राज्यातील सर्व विभागांमध्ये थेट महासमितीकडून काहीजणांना नियुक्त केले आहे. त्यातून माझी नियुक्ती झाली आहे.’’दौºयात आलेल्या अनुभवांबाबत बोलताना पटेल म्हणाल्या, ‘‘सोलापूर ,सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणच्या ब्लॉक अध्यक्षांपासून ते जिल्हाध्यक्षांपर्यंत सर्वांबरोबर बोलणी झाली. त्यानंतर या सर्व ठिकाणच्या साध्या कार्यकर्त्यांचीही भेट झाली. या भागात पक्षाचे संघटन चांगले आहे. युवकही पक्षाकडे आकर्षित झाले आहेत. त्यांच्यासाठी आता पक्षाच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात देशासमोरच्या समस्या, त्यावर कसे बोलायचे, कधी बोलायचे, नागरिकांशी कसा संपर्क साधायचा याबाबत माहिती दिली जाईल. त्यात्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, पक्षाचे प्रवक्ते त्यांना मार्गदर्शन करतील.’’काही भागात पक्षाचे संघटन कमी झाले आहे. त्या ठिकाणी बदल केले जातील असे स्पष्ट करून पटेल म्हणाल्या, ‘‘प्रदेश शाखेबरोबर त्यासंदर्भात बोलणी केली जातील. आमचा अहवाल थेट काँग्रेस महासमितीला जाणार असला तरी प्रदेश पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यासही सांगण्यात आले आहे.  राहूल गांधी पक्षात पुर्वीचे वैभव नक्की आणतील असे त्यांनी संघटनेबाबत उचलेल्या पावलांवरून स्पष्ट दिसते आहे. जे असेल ते स्पष्ट बोला, त्याशिवाय बदल होणार नाही असे त्यांचे सांगणे आहे व त्यातूनच पक्ष पुन्हा सत्तास्थानी विराजमान होईल. ’’

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेस