शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पीएमपी अध्यक्षपदाचे सातत्याने ब्रेकडाऊन; १२ वर्षात १५ अध्यक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 07:00 IST

काही अधिकाऱ्यांनी बदलीसाठी स्वत: प्रयत्न केले तर काही अधिकाऱ्यांची शासनाने बदली केली.

ठळक मुद्देमुंढे यांच्या बदलीसाठी स्थानिक पातळीवरूनही दबाव शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना बळ देणे अपेक्षित कोणतीही संस्थेची स्थिती सुधारण्यासाठी अधिक काळ व पुर्णवेळ अधिकारी आवश्यक

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष म्हणून कार्यकाळ पुर्ण करणारे अधिकारी न मिळण्याचे शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. सध्याच्या अध्यक्ष नयना गुंडे या कार्यकाळ पुर्ण करतील अशी अपेक्षा असतानाच गुरूवारी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. त्यामुळे डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या रुपाने ‘पीएमपी’ला १२ वर्षातच १६ वे अध्यक्ष मिळणार आहेत. आधी आघाडी नंतर युती आणि आता महाविकास आघाडी सरकारनेही ‘पीएमपी’चे ब्रेकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेची अनुक्रमे पीएमटी व पीसीएमटी ही स्वतंत्र बससेवा एकत्रित करून ‘पीएमपीएमएल’ ही कंपनी २००७ मध्ये स्थापन करण्यात आली. या कंपनीचे प्रमुख म्हणून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे पद निर्माण करण्यात आले. या पदावर राज्य शासनाकडून आएएस दर्जाच्या अधिकाºयांची नियुक्ती केली जाते. सुब्बराव पाटील हे पीएमपीचे पहिले अध्यक्ष ठरले. त्यांना जेमतेम १५ महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यानंतर जानेवारी २०११ पर्यंत चार वर्षात पाच अधिकाºयांची नियुक्ती झाली. दि. ३ जानेवारी २०११ मध्ये पदभार स्वीकारलेले आर. एन. जोशी यांनी आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला. आतापर्यंत पीएमपीला मिळालेल्या १५ अध्यक्षांपैकी केवळ जोशी हेच कार्यकाळ पुर्ण करू शकले. तर १५ पैकी आठ अधिकाºयांकडे पीएमपीची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. जोशी यांच्यासह केवळ सात अधिकाºयांकडे पीएमपीची पुर्णवेळ जबाबदारी होती. डॉ. श्रीकर परदेशी, तुकाराम मुंढे यांच्यासह अन्य काही सक्षम अधिकारी पीएमपीला मिळाले होते. पण काही महिन्यांतच त्यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला.  काही अधिकाऱ्यांनी बदलीसाठी स्वत: प्रयत्न केले तर काही अधिकाऱ्यांची शासनाने बदली केली. मुंढे यांच्या बदलीसाठी स्थानिक पातळीवरूनही दबाव टाकण्यात आला होता. ‘पीएमपी’ अस्तित्वात आल्यापासून आर्थिक स्थिती फारशी चांगली राहिलेली नाही. खिळखिळ्या बस, घटती प्रवासी संख्या, प्रवासी सुविधांचा अभाव या स्थितीत मागील १२ वर्षात फारसा फरक पडलेला नाही. कोणतीही संस्थेची स्थिती सुधारण्यासाठी अधिक काळ व पुर्णवेळ अधिकारी आवश्यक असतो. पण पीएमपीच्या बाबतीत हे घडताना दिसत नाही. राज्य सरकारकडून दरवेळी पीएमपीला दुर्लक्षित केले आहे. शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना बळ देणे अपेक्षित असताना सतत दुजाभाव करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ----------२००७ पासूनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक        अधिकारी                                                                        कार्यकाळ१)     सुब्बराव पाटील                                           दि. २६ ऑगस्ट २००७ ते ५ नोव्हेंबर २००८२)     अश्विनीकुमार                                             दि. ५ नोव्हेंबर २००८ ते ८ फेब्रुवारी २००९३)     नितीन खाडे                                                  दि. ९ फेब्रुवारी २००९ ते २४ ऑगस्ट २००९४)     महेश झगडे (अतिरिक्त पदभार)                  दि. २५ ऑगस्ट २००९ ते ७ सप्टेंबर २००९५)     शिरीष कारले (अतिरिक्त पदभार)                दि. ७ सप्टेंबर २००९ ते २३ फेब्रुवारी २०१०६)     दिलीप बंड (अतिरिक्त पदभार)                   दि. २३ फेब्रुवारी २०१० ते ३ जानेवारी २०११७)     आर. एन. जोशी                                          दि. ३ जानेवारी २०११ ते ३१ ऑक्टोबर २०१४८)     आर. आर. जाधव (अतिरिक्त पदभार)        दि. १ नोव्हेंबर २०१४ ते १२ डिसेंबर २०१४९)     श्रीकर परदेशी (अतिरिक्त पदभार)              दि. १२ डिसेंबर २०१४ ते ७ एप्रिल २०१५१०)    ओमप्रकाश बकोरिया (अतिरिक्त पदभार)  दि. ७ एप्रिल २०१५ ते ३० मे २०१५११)     कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार)            दि. ३० मे २०१५ ते ६ जून २०१५१२)     अभिषेक कृष्णा                                         दि. ८ जून २०१५ ते ८ जुलै २०१६१३)     कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार)          दि. ८ जुलै २०१६ ते २९ मार्च २०१७१४)     तुकाराम मुंढे                दि. २९ मार्च २०१७ ते ८ फेबु्रवारी २०१८१५)     नयना गुंडे                    दि. १२ फेब्रुवारी २०१८  --------------------------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे