शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

नियंत्रण कक्षाला ‘सौजन्याचे वावडे’

By admin | Published: September 21, 2015 4:12 AM

सर्वसामान्य नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच शहरातील सर्व घटनांची माहिती ठेवण्यासाठीच्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच शहरातील सर्व घटनांची माहिती ठेवण्यासाठीच्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘सौजन्याचे वावडे’ आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर उद्धट उत्तरे मिळत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, याची दखल संबंधित ‘सीआरओ’ घेत नसल्याचे चित्र आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये पोलिसांचा १०० क्रमांक मोडतो. या क्रमांकावर दिवसभरात काही हजारांच्या पटीत फोन येतात. बऱ्याचदा हा क्रमांक ‘एंगेज’च लागतो. नियंत्रण कक्षातील पोलीस हे फोन उचलतात. तेव्हा ज्याला काही माहिती द्यायची असते त्यालाच पोलिसांकडून प्रश्न विचारायला सुरुवात केली जाते. अनेकदा अडचणीत सापडलेल्या नागरिकांना महत्त्वाची माहिती हवी असते तेव्हाही उर्मटपणे उत्तरे दिली जातात. पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद पोलीस दल अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत असताना नियंत्रण कक्षाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सौजन्याने बोलण्याचे सोपस्कारही केले जात नाहीत. आपल्या भागात भांडणे सुरू असेल,रात्री उशिरापर्यंत स्पिकर सुरू असल्याने त्रास होत असेल, तर नागरिक १०० क्रमांकावर फोन करतात़ तेथील कर्मचारी मार्शलला अथवा स्थानिक पोलिसांना त्या ठिकाणी पाठवितात़ त्यांना ज्यांच्याकडून फोन आला, त्यांचा नंबर दिला जातो़ हे कर्मचारी तेथे गेल्यावर त्यांना फोन करुन तुमची काय तक्रार आहे, असे विचारतात़ या प्रकाराने तक्रार करणाऱ्यांचे नाव उघड होत असल्याने पुढे तक्रार केली म्हणून त्यांनाच त्रास सहन करण्याची वेळ यापूर्वी अनेकदा आली आहे़ जर एखादा गुन्हा, घटना पाहून त्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी कळवलीच, तर नियंत्रण कक्षाकडून माहिती देणाऱ्याचाच मोबाईल क्रमांक गस्तीवरील पोलिसांना (मार्शल) दिला जातो. घटनास्थळावर पोचल्यावर मार्शलवरील पोलीस सर्वांत आधी माहिती देणाऱ्याला फोन करतात. त्यालाच नाना प्रश्न विचारुन भंडावून सोडतात. पोलीस नियंत्रण कक्षामध्ये सध्या काही पोलीस ठाण्यांमधून संलग्न केलेले अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. तर काही जण शहरात बदलून आलेले आहेत; मात्र त्यांना अद्याप ‘पोस्टिंग’ मिळालेले नाही. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रात्रंदिन ‘पोस्टिंग’च दिसत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे त्यांचे लक्ष नाही. यासोबतच नियंत्रण कक्षाचे काही कर्मचारी व अधिकारी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या दर महिन्याच्या ‘सेवे’मध्ये मग्न असल्यामुळे आम्हाला काय कुणाची भीती, अशा अविर्भावात वावरत आहेत.