शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Maharashtra: ६४ ललित कलांच्या यादीवरून पुन्हा वादंग; वादग्रस्त भाग वगळण्याची अभ्यासकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 13:46 IST

एससीईआरटीने राज्य अभ्यासक्रम आराखडा- शालेय शिक्षणाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे...

पुणे : राज्य अभ्यासक्रम आराखडा- शालेय शिक्षण मसुद्यात मनुस्मृती ग्रंथातील संदर्भाचा उल्लेख केल्यावरून वाद सुरू असताना आणखी नवीन वाद निर्माण झाला आहे. कलाशिक्षण प्रकरणात ६४ ललित कलांची यादी दिली असून, त्याचा स्रोत वात्स्यायन यांचे कामशास्त्र असल्याचे नमूद आहे. मनुस्मृतीप्रमाणेच हा उल्लेख शालेय आराखड्यात करणे अत्यंत चुकीचे आहे. यातील जुगार खेळणे, चलाखी करून हाताेहात फसवणे, गारूडविद्या आणि जादूटोणा यांचे ज्ञान असणे आदी कलांचाही उल्लेख असून, त्या भारतीय संविधान आणि कायद्याविरुद्ध असल्याचे सांगत हे संदर्भ वगळावेत, अशी मागणी साहित्यिक, अभ्यासकांनी केली आहे.

एससीईआरटीने राज्य अभ्यासक्रम आराखडा- शालेय शिक्षणाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यावर महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, आंतरभारती, राष्ट्र सेवा दल, शिक्षण हक्क परिषद आणि साहित्यिक कलावंतांनी व्यापक चर्चा केली आणि काही आक्षेप, तसेच प्रतिक्रिया, सूचना राज्य सरकारला सुचविल्या आहेत. मसाप येथे आयाेजित पत्रकार परिषदेत भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष व माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, मसापच्या कार्यवाह सुनीताराजे पवार, अंजली कुलकर्णी, संदीप सांगळे आदी मान्यवर उपस्थित हाेते.

अभ्यासक्रम आराखड्यातील कलाशिक्षण प्रकरण ५ मधील पृष्ठ क्रमांक २१६ त्यातील परिशिष्ट- अ मध्ये ६४ ललितकलांची यादी दिली आहे. ती मुनी वात्स्यायन यांच्या कामशास्त्रावरून घेतली आहे. त्यातील छलिक याेग (चलाखी करून हाताेहात फसवणे), द्यूतक्रीडा (जुगार खेळणे), इंद्रजाल (गारूडविद्या व जादूटाेणा यांचे ज्ञान असणे) या कामशास्त्रातील ललितकला नैतिकतेविरुद्ध आहेत. हा संदर्भ मनुस्मृतीप्रमाणे वादाचा आहे. या यादीतील अनेक कला भारतीय राज्यघटनेनुसार अपेक्षित समाजनिर्मित्ती आणि नैतिक मूल्यांविरुद्ध आहेत. अंधविश्वाला चालना देणाऱ्या आहेत. थाेडक्यात ही ललितकलांची यादी आजच्या आधुनिक काळात कालबाह्य झाली आहे, म्हणून ती वगळावी त्याऐवजी आधुनिक काळाशी सुसंगत अशी ललित कलांची यादी बनवावी. उदा. ओराेगामी ही कागदाची हस्तकला, सुलेखन, मेकअप, कॉम्प्युटर, पेंटिंग, अशा स्वरूपाच्या विविध कलांची यादी तज्ज्ञ व्यक्तीकडून बनवून समाविष्ट करावी, असे नमूद केले आहे.

अभिप्राय आणि नवीन सूचना :

१. सर्व भाषा माध्यमे व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी व इंग्रजी अनिवार्य करा.

२. भारत हा बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक आणि संविधानाप्रमाणे धर्मनिरपेक्ष देश आहे, त्यामुळे शालेय शिक्षणात सरकारी धोरण म्हणून धार्मिक शिक्षण असू नये.

३.सर्वधर्मसमभाव या संविधानाच्या तत्त्वाचे उपक्रम राबविताना पालन करावे.

४. मनुस्मृती हा ग्रंथ जातीव्यवस्था समर्थक आणि स्त्री वर्गास दुय्यम लेखणारा आहे, तो भारतीय संविधानविराेधी आहे. अंतिम आराखड्यातून उल्लेख वगळावा.

५. विज्ञान शिक्षणातून विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे व प्रश्न विचारण्याची संस्कृती निर्माण करून त्यातूनच संशोधन वृत्ती वाढीस लागू शकते.

६. समाजशास्त्र शिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांत संवेदनशीलता, सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे, हे असावे.

७. अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण हे सातवी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी आणि पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी संविधान शिक्षणाचा समावेश करावा.

पाठ्यपुस्तके निर्मितीमध्ये सर्वसमावेशकता गरजेची

प्रबोधन चळवळ व स्वातंत्र्य संग्रामातून सर्वमान्य झालेली पुरोगामी व आधुनिक मूल्ये आणि संविधानिक तत्त्वज्ञानाचे विद्यार्थ्यांवर संस्कार करणे आहे, तसेच संकीर्ण सांप्रदायिकता व भेदभावास त्यात थारा नसेल, याची पाठ्यपुस्तके लिहिताना दक्षता घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षण