शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

कोरेगाव भीमा घटना सुनियोजित, शोध समितीचा दावा, पोलीस अधीक्षकांना देणार घटनेचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 01:35 IST

कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. स्थानिक पोलीस यंत्रणेला अनुचित प्रकार होणार असल्याचे माहिती असूनही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा शोध समितीतर्फे शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

पुणे : कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. स्थानिक पोलीस यंत्रणेला अनुचित प्रकार होणार असल्याचे माहिती असूनही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा शोध समितीतर्फे शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक क्षेत्रात काम करणाºया १० जणांची शोध समिती स्थापन करण्यात आली होती. समितीमध्ये पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भारिप बहुजन महासंघाचे प्रा. म. ना. कांबळे, राहूल मखरे, विकास साळवे, दत्ता पोळ, राजेंद्र गायकवाड, किरण शिंदे, रमाकांत खंडे आदींचा समावेश होता.समितीने शिक्रापूर, लोणी काळभोर, कोरेगाव भीमा, पेरणे, वढू आदी गावांमधील नागरिकांशी संवाद साधला. त्यावर प्राप्त माहितीच्या आधारे अहवाल तयार केला असून, सोमवारी (दि.२२) तो पोलीस अधीक्षकांना दिला जाणार आहे.धेंडे म्हणाले, कोरेगाव भीमा घटना हा दलित विरूध्द मराठा या समाजातील संघर्ष नाही. काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला.आम्ही या घटनेशी संबंधित अनेकांशी संवाद साधला. त्यांचे सुमारे ५०० फोटो, व्हिडीओ आणिआॅडिओ संकलित केले. त्यातून हापूर्व नियोजित कट होता.हल्ला झाल्यानंतर दंगल उफाळून आली होती. लहान मुलांचे भांडण झाले, तरी दलित वस्तीवर हल्लाहोऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येथे तत्काळ सामाजिक सलोख्याचे वातावरण करण्याची गरज आहे.मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे या कटात सहभागी असल्याचे उपलब्ध माहितीच्या आधारे दिसून येते, असा दावा प्रा. कांबळे यांनी केला.समाधीचे शुद्धिकरण केले?केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर, काही जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी समाधीचे शुद्धिकरण केले, अशी माहिती शोध समितीला मिळाल्याचा दावा डॉ. धेंडे यांनी केला.नुकसानग्रस्तांनी भरपाई देणार -जिल्हाधिकारी सौरभ रावकोरेगाव भीमा, सणसवाडी व अन्य ठिकाणच्या नुकसानीचे साडेदहा कोटींचे पंचनामे करण्यात आले असून, आॅडिटनंतर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येणार आहे. दंगलीतील कारवाईत निर्दोषांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असे सांगत गावातील सामाजिक सलोख्याबाबत ग्रामस्थांवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी कौतुकाची थाप दिली. कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेत, श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील संभाजी महाराज समाधीस्थळ व गोविंद गायकवाड यांच्याही समाधीस्थळाची जिल्हाधिकारी राव यांनी पाहणी केली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव