शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Corona virus : मुख्यमंत्री म्हणतात, काळजी करू नका; पुण्यावर अजित दादांचं लक्ष आहे.! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 15:14 IST

लोकप्रतिनिधी , प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात समन्वय राखणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना निर्मूलन आढावा बैठक

पुणे : कोरोना ही एक राज्यावर आलेली आपत्तीच आहे. भविष्यातील परिस्थितीचा अंदाज बांधणे कठीण आहे. या परिस्थितीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यासह वैद्यकीय यंत्रणेशी समन्वय राखणे गरजेचे आहे. मात्र, कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन व आरोग्ययंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. आणि पुण्यातील  परिस्थितीवर अजित दादा खूप बारकाईने लक्ष ठेवून काम करत आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. 

पुण्यातील विधानभवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्‍या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,  तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, सुरुवातीला मुंबईतील परिस्थिती देखील गंभीर होती. काहीच कळत नव्हते नेमकं काय करावे.कारण कोरोना या महामारीवर कोणतेही औषध नाही. फक्त कोणत्या औषधांनी रुग्ण बरे वाटेल हे सर्व अंदाजच होते. मात्र काही ठोस निर्णय घेत मुंबई तातडीने टास्क फोर्स स्थापन केले. चाचण्या, औषधोपचार सर्व गोष्टीवर चर्चा केली.. सुरूवातीला सगळ्याच यंत्रणा खुप पॅनिकमध्ये होत्या. नंतर परिस्थिती आटोक्यात येत गेली. या परिस्थितीत  व्हेंटिलेटर पाहिजेच परंतु,  व्हेंटिलेटर पेक्षा ऑक्सिजन जास्त उपयोगी ठरत आहे. केंद्राकडून व्हेंटिलेटर आले आहेत.

मुख्यमंत्री यांनी सांगितले की, पुण्याचीच नाही तर सर्वच महापालिकांची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. राज्य शासन केंद्राकडे  मागणी करत आहेच. शक्य तेवढी सगळी मदत करणार आहे. त्याप्रमाणे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात समन्वय पाहिजे. वेळमारुन नेण्यासाठी लाॅकडाऊन करतो अस नाही.. जम्बो फॅसिलिटीज निर्माण करण्यासाठी या काळाचा उपयोग झाला. - पुण्यात देखील अनेक खासगी हाॅस्पिटल आहेत. बेडस् उपलब्ध होत नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी निभावली पाहिजे. जास्तीत जास्त प्रमाणात कोरोनाबद्दल जनजागृती केली पाहिजे. राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला आहे.

कोरोनासारख्या महाभयंकर संकटात जग, देश यांच्यासह अन्य राज्यांचा अनुभव घेतला आहे. अजून राज्यात कोरोनाची लाट संपलेली नाही, आणखी किती लाटा येतील याची माहिती नाही. औषधे येतील.. पण आता आपल्याला कोरोनासोबत जगायला पाहिजे, असेही ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका