शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Corona virus : पुणे शहरातल्या पेठांमधली अनियंत्रित मोकळीक कोरोनाच्या पथ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 17:43 IST

कसलीही स्वच्छता नाही, कोणीही मास्क वगैरे लावलेला नाही अशा गर्दीकडे ना कोणाचे लक्ष ; ना त्यांना कोणी हटकत होते.

ठळक मुद्देसंदिग्ध निर्णयाचा परिणाम: कोणालाच कसली काळजी नाहीदुकाने बंद असूनही बेकर्या, भाजीपाला, दुध डेअरी खुल्या असल्याने त्यांच्यासमोर गर्दी

पुणे: सलग ४५ दिवसांच्या लॉकडाऊन वर प्रशासनाच्या निर्णयातील संदिग्धतेमुळे पाणी पडले आहे. सर्वाधिक कोरोना रूग्ण सापडलेल्या पूर्व भागात अनेक नागरिक शुक्रवारी सकाळी बिनदिक्कतपणे फिरताना दिसत होते. त्यांना व मागील महिनाभर त्यांच्यावर नियंत्रण ठेवून असणाऱ्या प्रशासनाला कसलीच काळजी नसल्याचे चित्र या भागात दोनच दिवसात तयार झाले आहे.शहराचा मध्यभाग असलेल्या सर्व रविवार, सोमवार अशा सर्व पेठा, बोहरी आळी, गंजपेठ, मासेआळी, लोहियानगर, टिंबर मार्केट, मोमीनपूरा, डाळ आळी, दगडूशेठ हलवाई गणपती, त्यापुढे मंडई, बाजीराव रस्ता, चिंचेची तालीम या सर्व भागात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. पुण्याचे सगळे सार्वजनिक आरोग्य या भागावर अवलंबून आहे. त्यामुळेच मागील दिड महिना या भागात कडक लॉकडाऊन पाळण्यात येत होते.

गल्लीबोळात असलेल्या वाड्यांमध्ये जाऊन महापालिकेचे सर्वेक्षण करणारे कर्मचारी मास्कचे वाटप करत होते. फुकट मिळणारे हे मास्क घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांभोवती झुंबड ऊडत होती. सुरूवातीला सर्वांचे नाव पत्ते घेणाऱ्या कर्मचाऱ्याने थोड्याच वेळात फक्त कुटुंब प्रमुखांचे नाव व सदस्य संख्या सांगा असे म्हणत स्वत:ची या किचकट कामातून सुटका करून घेतली. त्या कागदांवर सह्याही मग त्याच्याच सहकायार्ने ठोकल्या.

दुकाने बंद असूनही बेकर्या, भाजीपाला, दुध डेअरी खुल्या असल्याने त्यांच्यासमोर गर्दी होती. दत्तवाडीत तर भाज्यांचे लहान लहान वाटे लावून अनेकजण भाजी विकत होते. त्यांच्याकडेही गर्दी होती. कसलीही स्वच्छता नाही, कोणीही मास्क वगैरे लावलेला नाही अशा त्या गर्दीकडे ना कोणाचे लक्ष होते, ना त्यांना कोणी हटकत होते. दत्तवाडी पोलिस चौकी, गंजपेठ पोलिस चौकी यांना अगदी लागून हे प्रकार सुरू होते. दोन्ही ठिकाणी काही पोलिसांना विचारले तर त्यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ऊघडी ठेवायची ही वेळ आहे, इथे असेच चालते असे ऊत्तर अतीशय शांतपणे दिले. मग त्यांचे त्यांनाच काही वाटून त्यांनी गर्दीला हटकण्यास किरकोळ सुरूवात केली.

या भागातील नागरिकांना कोरोना विषाणू ,संसर्ग, लॉकडाऊन सगळ्याची नीट माहिती आहे, मात्र त्यापासून काळजी कशी घ्यावी याचीच वानवा आहे. सरकारी सुचना मोडण्यासाठीच आहे याची त्यांना जणू खात्रीच आहे. त्यात त्यांना थरार वाटतो. त्यामुळेच फुकट मिळणाऱ्या रेशनिंगच्या रांगेत नंबरवरुन जोरात भांडणे होतात. दारूच्या दुकानांसमोर सकाळपासून आंघोळ वगैरे न करताही रांग लावण्याचे त्यांना काहीही वाटत नाही. त्यांची जगण्याची शैलीच माहिती नसल्याने प्रशासन त्यांच्या पचनी न पडणारे निर्णय घेऊन शहराला आणखी धोका निर्माण करत आहे असेच इथल्या काही समजदार नागरिकांचे म्हणणे आहे.------कोणती दुकाने कधी ऊघडायची याबाबत प्रशासनाने वेळापत्रक तयार केले असल्याचे सांगतात, आम्ही स्वत: दुकानदार असून आम्हालाच ते माहिती नाही. माहिती असूनही ते पाळायचे म्हटले तर इतरजण ते पाळत नाहीत. गर्दी होणारच कारण इथल्या लोकसंख्येच्या प्रमाणात दुकानांची संख्या कमी आहे. सुरूवातीपासूनच दुकाने जास्तीतजास्त वेळ खुली ठेवायला हवी होती.अजय उणेचा,किराणामाल दुकानदार-------मी इथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतो. नागरिकांना विश्वासात घेऊन प्रशासनाने निर्णय घ्यायला हवे होते. हे लोक ज्यांना मानतात त्या सर्व पुढारी, पदाधिकाऱ्यांना प्रशासनाने काहीही सांगितले नाही. त्यामुळेच नियम मोडण्याकडेच सर्वांचा कल आहे.- सुहास गणबोटे,व्यावसायिक छायाचित्रकार-------गरीब कष्टकरी वर्गाचा हा सर्व भाग आहे. त्यांना रोज कमवावे लागते व मगच खावे लागते. कमाई बंद आणि जगा असे सांगितल्यावर कोण शांत बसून राहील? त्यामुळेच ऊधारी, चोरी, कामे असे काहीही करून पैसे मिळवणे, वस्तूंचा साठा करणे, फुकट मिळणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी गर्दी करणे असे प्रकार होणारच.बाळासाहेब रांजणे-----सरकार काही देत नाही, आम्हाला कमवूही देत नाही, साठवलेले सगळे पैसे संपले, आता दुकान बंद, मग पोराबाळांना खायला काय घालायचे, निवारा केंद्रात घेऊन जायचे का?मोमीनपुरा येथील एक नागरिक

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसvegetableभाज्याfruitsफळेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्य