शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक ; जनजागृतीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 18:45 IST

स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते काेराेनाच्या संकटाच्या काळात घराबाहेर पडून गरजूंना मदत करत आहेत. परंतु त्यांच्याकडे आता काेराेना संशयितेच्या नजरेने पाहिले जात आहे.

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग कोणत्याही प्रकारे कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना केवळ व्यक्तीच्या शरीरावर परिणाम करत नसून, मानसिकताही बदलू पाहत आहे. कोरोनाशी दोन हात करू पाहणाऱ्या व्यक्तींकडे, स्वयंसेवकांकडे, सामाजिक कार्यकर्त्यांकडे आजूबाजूचे लोक संशयाने पाहत असून त्यांना पटकन स्वीकारायला तयार होत नाहीत. अशा परिस्थितीत शासनाने नाममात्र शुल्क आकारून स्वयंसेवकांना 'स्वविलगीकरणाची' सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पुढे येत आहे. यासाठी पुढील दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे, पोलीस आणि शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सामान्यांमध्ये जनजागृती व्हावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

महाराष्ट्र गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाविरोधात लढा उभारत आहे. यामध्ये डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी, पत्रकार अशा अनेक घटकांचा समावेश आहे. याचप्रमाणे, गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येणाऱ्या संस्था, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्तेही पुढे सरसावत आहेत. मात्र, अशा व्यक्तींबाबत सोसायटीतील किंवा भवतलाच्या परिसरातील व्यक्ती, नातेवाईक संशयाच्या नजरेने पाहतात. त्यांच्यापासून संक्रमण होण्याची भीतीही अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली जाते. प्रत्यक्ष बाहेर पडून काम करणारे स्वयंसेवक स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत आहेत. तरीही समाजाकडून मिळणारी दुर्लक्षित, संशयास्पद वागणूक यामुळे धैर्य तुटत चालल्याची खंत स्वयंसेकांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.

समाजावर कोरोनासारखे भयंकर संकट डोकावत असताना सर्वांनी एकजुटीने सामना करण्याची गरज आहे. प्रत्येक जण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मदत करू शकत नाही. मात्र, एकमेकांना पाठिंबा देऊन ही लढाई लढता येऊ शकते. सेवाभावी संस्था, स्वयंसेवक गरजूंना अन्नधान्य पुरवठा करणे, डॉक्टर, पोलीस यांच्या कामाचा ताण कमी करणे असे प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहण्याची मानसिकता कधी बदलणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते घरातही स्वतःला क्वारंटाईन करून घेत आहेत, मास्क आणि सॅनिटायझरचा वापरणे, इतर लोकांच्या संपर्कात येणे टाळणे अशा उपाययोजनांचा अवलंब करत आहेत. अशा वेळी कौतुकाचे चार शब्द तर दूरच; मात्र समाजाकडून मिळणारी नकोशी वागणूक, हेटाळणी थांबावी, यासाठी जनजागृती केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाविरोधातील लढाईत सध्या मनुष्यबळाची प्रचंड आवश्यकता आहे. गरजूंना अन्नधान्य वाटप, पोलिसांना मदत, तपासणी कॅम्प अशा विविध स्तरांवर कामे सुरू आहेत. याकामी बाहेर पडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सोसायटीमधूनच वाईट वागणूक मिळत आहे. तुमच्यामुळे संसर्ग पसरेल, अशी टिपण्णी ऐकायला मिळते. फिजिकल डिस्टनसिंगचे सर्व नियम आम्ही पाळत असल्याने आमच्याकडे गुन्हेगार म्हणून न पाहता समाजाने स्वीकारावे, एवढीच अपेक्षा आहे. 

- रघुनाथ येमुल, अध्यक्ष, दिव्यांग इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

बाहेरचे काम आटोपून किंवा ड्युटी संपवून घरी गेल्यावर कोरोनाच्या काळात लोक सहजासहजी स्वीकारत नाहीत. त्यामुळे बाहेर कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी शासनाने नाममात्र दरात विलगीकरण सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत.

- संदीप साताळे, सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे