शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले

By राजू इनामदार | Updated: January 10, 2025 16:26 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घ्यावी व त्यांची तोंडे बंद करावीत अशी मागणीही सामंत यांनी केली

पुणे: उद्धवसेनेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी तिथे आपल्याला उमेदवारी मिळेल का याची काळजी करावी, फुकटची मते व्यक्त करू नयेत असा संताप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केला. भाजपत गेलेल्या या ५ माजी नगरसेवकांनी पत्रकारांबरोबर बोलताना खऱी शिवसेना ठाकरेंचीच असे वक्तव्य केले होते. त्यावरून मंत्री सामंत यांचा पारा चढला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याकडे आलेल्या या ५ नगरसेवकांना समज द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विश्व मराठी भाषा संमेलनाच्या नियोजनसाठी म्हणून सामंत पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या ५ माजी नगरसेवकांचा समाचार घेतला. ते तिकडे गेले त्याविषयी काही म्हणायचे नाही, मात्र जाताना त्यांनी विनाकारण खरी शिवसेना ठाकरेंचीच असे मत व्यक्त केले. असे बोलण्याचा त्यांचा संबध काय? ज्या पक्षात ते गेले आहेत तिथे उमेदवारी मिळेल का याची काळजी त्यांनी करायला हवी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घ्यावी व त्यांची तोंडे बंद करावीत अशी मागणीही सामंत यांनी केली.

दरम्यान शिंदेसेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनीही त्या ५ जणांच्या या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला. पत्रकार परिषदेत त्यांनी ५ ही जणांवर टीका केली. शहर उपप्रमुख सुधीर कुरूमकर यांनी सांगितले की खरी शिवसेना कोणती हे सांगण्यासाठी या ५ जणांच्या दाखल्याची कोणालाच गरज नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आमच्या शिवसेनेला भरघोस मतदान करून खरी शिवसेना कोणाची हा निकाल आधीच दिला आहे. अभिजित बोराटे यांनी सांगितले की त्या ५ जणांचा भाजप प्रवेश सत्तेच्या मोहापोटी झालेला आहे. भाजप व आमची युती आहे. त्यामुळे त्या ५ जणांचे तोंड बंद करण्याची जबाबदारी आता स्थानिक भाजप नेत्यांची आहे. त्यांनी ते केले नाही तर त्यांचे तोंड आम्ही बंद करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. विशाल सरोदे, प्रदीप धिवार व अन्य पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणBJPभाजपाMahayutiमहायुती