शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा

By admin | Published: February 28, 2017 1:34 AM

प्रवाह कशाचाही असो, तो नेहमी अखंड आणि अविरतपणे वाहत असतो

-डॉ. अनिल लचकेप्रवाह कशाचाही असो, तो नेहमी अखंड आणि अविरतपणे वाहत असतो. त्याला गती आणि सातत्य असतं. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रवाह असाच; पण वेगवान असतो. अनेक शाखा-उपशाखांचे प्रवाह त्याला येऊन मिळत असतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तर जिथं विज्ञानाचा उपयोग झालेला नाही, असं एकही क्षेत्र सांगता येणार नाही. परिणामी सामान्य माणसांच्या जीवनात त्याचे केवळ पडसादच नाही तर ठसे उमटलेले आहेत. माणुसकीची उंची आणि वैभव वाढवणे आणि त्याचे जीवनमान सुखसंपन्न करणे हेच तर विज्ञानाकडून अपेक्षित आहे. पंडित नेहरू द्रष्टे होते. त्यांनी मोठ्या उमेदीने देशाच्या कानाकोपऱ्यांत विविध प्रयोगशाळांची ‘ज्ञान-मंदिरे’ उभारली. विज्ञान-तंत्रज्ञानाचा फायदा थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, हीच त्यामागे भूमिका होती.  प्रगतीची थक्क करणारी भरारी आज आपला देश अणुतंत्रज्ञानात; म्हणजे अणुशक्तीची निर्मिती करण्यास सज्ज झाला आहे. अपारंपरिक ऊर्जा उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. काही वर्षांनी ऊर्जेचे अतिरिक्त उत्पादन होईल. औद्योगिक क्षेत्राला त्याचा लाभ होईल. भारताने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी १०४ उपग्रह पीएसएलव्हीमार्फत तंतोतंत नियोजित कक्षेत सोडून आपले अवकाश तंत्रज्ञानातील प्रभुत्व सिद्ध केलंय. यात एकट्या अमेरिकेचे ९६ उपग्रह होते! अनेक उपग्रह आयआयटी (कानपूर) आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्याथिर्नींनी घडवलेले आहेत. उपग्रहांची नावेही देशी आहेत- स्वयं, सत्यभामा, जुगुनू वगैरे. परकीय देशांचे १८० उपग्रह भारताने अंतरिक्षात सोडून अंतराळातील बाजारपेठ काबीज केली आहे. अशा यशस्वी वैज्ञानिक प्रकल्पांमुळे नागरिकांची अस्मिता, आत्मविश्वास आणि अभिमान जागृत झालाय. एकंदरीत पाहिलं तर विज्ञान आणि समाज याची फारकत होण्याची शक्यता नाही! २८ फेब्रुवारीच्या विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपल्या प्रगतीच्या पडद्यामागच्या संशोधकांची आठवण होते आणि ही भावना सुखदायी आहे. चीन, पाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देशांनी १०४ उपग्रह सोडणाऱ्या पीएसएलव्ही मोहिमेचे मनोमन कौतुक केलेले आहे. जर भौतिकीशास्त्राचा पाया मजबूत असेल तरच १०४ उपग्रह एकामागोमाग एक (न धडकता) विशिष्ट कोनातून अचूकपणे ‘लॉन्च’ करता येतात. नंतर ते आपाआपल्या कक्षेत भ्रमण करू लागतात. म्हणूनच भारतीय तंत्रज्ञांनी आपले कौशल्य सिद्ध केलंय, असं चीनचे जाणकार म्हणतात.(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)