शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
4
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
5
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
6
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
7
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
9
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
10
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
11
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
12
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
13
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
14
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
15
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
16
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
17
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
18
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
19
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
20
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

Devendra Fadnavis: गुन्हे घडताहेत; पण पोलीस लगेच कारवाईही करतायेत - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 09:49 IST

गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा वाढवण्याचा आमचा विचार आहे

पुणे : गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य होत आहेत हे खरे आहे; पण सर्वसाधारणपणे अशा घटना घडल्यावर पोलिस लगेच कारवाई देखील करत आहेत, अशा शब्दांमध्ये बीड प्रकरणाचा थेट उल्लेख न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गुन्हेगारी घटना वाढत असल्याचे मान्य केले. सीसीटीव्ही नेटवर्क वाढवून आम्ही यावर नियंत्रण मिळवत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यात गुरुवारी सायंकाळी एका कार्यक्रमासाठी आले असताना फडणवीस यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. बीड प्रकरण व राज्यात एकूणच वाढलेल्या गुन्हेगारीकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी गुन्हे वाढल्याचे अप्रत्यक्षपणे मान्यच केले. ते म्हणाले, काही गोष्टी घडत आहेत हे खरे आहे; पण म्हणून वाढ झाली असे म्हणता येणार नाही. अशा प्रकरणात पोलिस तातडीने कारवाई करतात. आरोपींना अटक होते, असेही होत आहे. सीसीटीव्ही यंत्रणा वाढवण्याचा आमचा विचार आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळेल.

सरकारचा पुढील १०० दिवसांचा कार्यक्रम आम्ही निश्चित केला आहे. प्रत्येक विभागाला काय करायचे ते निश्चित करून दिले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. पुण्यासाठी नियोजित पुरंदर विमानतळ महत्त्वाचा आहे. सध्याच्या विमानतळाचा आम्ही विस्तार केला. या विस्ताराचा उपयोग होत आहे. पुरंदर विमानतळासाठी कालच बैठक घेतली. भूसंपादनाची गती वाढवा असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रात विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल तिकडचा दुष्काळ संपवण्याकरता आपण चार नदी जोड प्रकल्प हातात घेतले आहेत. त्याच्या चार निविदाही निघाल्या आहेत. त्याला वेळ लागेल, पण एकदा ते प्रकल्प पूर्ण झाले की महाराष्ट्रातला दुष्काळ संपेल, असा विश्वासदेखील फडणवीस यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPoliticsराजकारण