शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

हलक्या पावसाने तरली पिके; पूर्व विदर्भात चांगला पाऊस, जोरदार पावसाची प्रतीक्षा

By नितीन चौधरी | Updated: August 20, 2023 16:11 IST

पाऊस पडला तरी धरणसाठ्यात वाढ न झाल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

पुणे: तब्बल दोन ते तीन आठवड्यांच्या खंडानंतर राज्यात गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने खरिपातील बहुतांश पिकांना जीवनदान मिळाले आहे. हा पाऊस केवळ भीज स्वरूपाचा असल्याने पिकांना जरी दिलासा मिळाला असला तरी धरणांच्या पाणीसाठ्यात कोणतीही वाढ होणार नाही अशीच चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणखीन जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे राज्यात पेरण्यांना उशीर झाला. मात्र, त्यानंतर जुलैत झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरण्या मार्गी लागल्या पाऊस उशिरा दाखल झाल्यामुळे उडीद मुगासारखी कडधान्याची पिके शेतकऱ्यांना करता आली नाहीत. जुलैनंतर साधारण महिनाभर राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोकण व पूर्व विदर्बातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता अन्यत्र पावसाची स्थिती जेमतेमच होती. मात्र जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून १८ ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली. तर १३ जिल्ह्यांतील ५३ मंडळांमध्ये पावसाचा खंड हा २२ ते २५ दिवस इतका होता. त्याचा थेट परिणाम पिकांच्या विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, भात, मका यासारख्या महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊस जोरदार झाला नसला तरी हलक्या स्वरूपाचा पाऊस अनेक दिवस सुरू होता. त्यामुळे पिकांमध्ये आंतरमशागत करता येत नव्हती. शेतांत तण माजल्याने शेतकऱ्यांना ज्यादा पैसे देऊन मजुरांना बोलवावे लागत होते. त्यामुळे अशा ठिकाणी पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांना आंतरमशागतीची कामे करता आली.

नागपूर विभागात चांगला पाऊस

राज्यात एक ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत ७८ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या २७.३ टक्के पाऊस झाला आहे. नागपूर विभागात १७४ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला आहे. राज्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. अमरावती विभागात ६१.५ मिलिमीटर (२६.५ टक्के) संभाजीनगर ३५ मिलिमीटर (१८.२ टक्के) पुणे विभागात ५१.३ मिलिमीटर (२०.७ टक्के), नाशिक विभागात ३५.२ मिलिमीटर (१७.८ टक्के) तर कोकण विभागात १८८.२ मिलिमीटर (२४.६ टक्के) पाऊस झाला आहे.

''या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. आणखी १५ दिवसांनी असाच पाऊस झाल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. - विनय आवटे, सहसंचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे'' 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीDamधरणWaterपाणी