शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राज्यात भाताच्या अवघ्या ३४ टक्क्यांवर पेरण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 13:34 IST

राज्यात १ ते २२ जुलै या कालावधीत सरासरी ५०९ मिलिमीटर पाऊस होतो.

ठळक मुद्देपुणे-नाशिक विभाग मागे : तूर, मूग, उडीद पिकाचे क्षेत्र घटणार

पुणे : राज्यातील १०९ लाख ८२ हजार हेक्टरवरील पेरण्या झाल्या असल्या तरी भात क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने भाताच्या अवघ्या ३४ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. कापूस आणि सोयाबीनच्या पेरणीचा टक्का सरासरीच्या जवळ पोहचला आहे. पावसाअभावी तूर, मूग आणि उडीद पिकाच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. राज्यात १ ते २२ जुलै या कालावधीत सरासरी ५०९ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ३८६.६० (७५.३६ टक्के) इतका झाला आहे. वर्ध्यामधे सरासरीच्या पन्नास टक्के देखील पाऊस झालेला नाही. ठाणे, पालघर, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा शंभरटक्के पाऊस झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि बुलढाणा येथे सरासरीच्या ७५ ते शंभर टक्के पावसाची नोंद झाली असून, उर्वरीत १९ जिल्ह्यांमधे सरासरीच्या ५० ते ७५ टक्के पर्जन्यमान झाले आहे. राज्यात ऊस पीक वगळून खरीपाचे क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून, पैकी १०९.८२ लाख हेक्टरवर(७८.०७टक्के) पेरणी झाली आहे. ऊस पिकासह १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र असून, ११०.३६ लाख हेक्टरवर (७३.७० टक्के) पेरणी आणि लागवडीची कामे झाली आहेत. कोकण विभागात ३६,३५५ आणि पुणे विभागात ४,९२९ हेक्टरवरील भात रोप वाटिकेची कामे झाली आहेत. कोकण विभागात भाताचे सरासरी क्षेत्र ३ लाख ९२ हजार ३९२ हेक्टर असून, पैकी २ लाख २९ हजार ६९० हेक्टरवर (५९ टक्के) पेरणी झाली आहे. कोल्हापूर विभागात भाताचे १ लाख ७८ हजार ७३१ हेक्टर क्षेत्र असून पैकी १ लाख ३६ हजार ५४७ (७६ टक्के) आणि पुणे विभागात ८० हजार ९०२ हेक्टरपैकी ३२ हजार ४० (४० टक्के) हेक्टरवर भात लावणी झाली. नाशिक विभागात ९६ हजार ३६१ हेक्टरपैकी २६ हजार १७१ (२७.२ टक्के) हेक्टरवर लागवडीची कामे झाली आहेत. राज्याचे भाताचे सरासरी क्षेत्र १५ लाख ८ हजार २२१ हेक्टर पैकी ५ लाख ११ हजार ८०८ हेक्टरवर (३४ टक्के) भात लागवडीची कामे उरकली आहेत. सोयाबीनचे क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३४ हेक्टर असून पैकी ३३ लाख ३ हजार ४७३ (९३ टक्के) आणि कापसाचे ४१ लाख ९१ हजार १४४ हेक्टरपैकी ४० लाख ६३ हजार ५५ हेक्टरवरील (९६.९४ टक्के) कामे पूर्ण झाली आहेत. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसNashikनाशिक