शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

नियोजनाअभावी दिवसाआड पाणी

By admin | Published: October 14, 2015 3:32 AM

साठवण तलावाचे काम रेंगाळल्यामुळे बारामतीत ऐन सणाच्या काळात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. कमी पडलेला पाऊस, लांबलेल्या आवर्तनामुळे पाण्याचे नियोजन करावे लागत आहे

बारामती : साठवण तलावाचे काम रेंगाळल्यामुळे बारामतीत ऐन सणाच्या काळात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. कमी पडलेला पाऊस, लांबलेल्या आवर्तनामुळे पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. तसे नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु, मागील तीन वर्षांपासून साठवण तलावाचे काम रेंगाळत चालले आहे. बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पहिल्या साठवण तलावाचे काम देण्यात आले. या साठवण तलावाला वर्षभरातच मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. दररोज दोन ते अडीच लाख लिटर पाणी वाहून जाऊ लागले. गळती काढण्यासाठी अगोदर बांधलेल्या सिमेंटच्या साठवण तलावातील पाणी उपसा करावा लागला. त्यानंतर गळती थांबविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तलावाचा तळ काँक्रीट मजबूत नसल्यामुळे गळतीचे प्रमाण कमी झाले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून १२८ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधण्यात आला. त्यानंतर वर्षभरातच या तलावाला गळती लागली. पाणीपुरवठा विभागाने मोटारी लावून वाहून जाणारे पाणी पुन्हा तलावात सोडण्याचे काम ७ ते ८ महिने केले. सातत्याने जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली. तलावातील पाण्याचा उपसा केला. लाखो लिटर पाणी वाया गेले. आता ऐन सणाच्या काळात पाण्याची टंचाई जाणवत आहे. ज्या ठेकेदाराने पहिल्या साठवण तलावाचे काम केले आहे, त्यालाच ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी साठवण तलावाचे काम तीन वर्षांपूर्वी देण्यात आले आहे. कामाचा वेग सुरुवातीपासूनच मंदावला आहे. दरम्यानच्या काळात पाणीटंचाई असल्याने तसेच, अगोदर बांधलेल्या तलावातील पाण्याची गळती होत असल्यामुळे केलेल्या खोदकामातच कालव्याचे पाणी अडविण्यात आले. त्यामुळे काम थांबले. त्यानंतर अगोदरच्या सिमेंट तलावाची गळती काढण्यासाठी पाण्याचा उपसा केला. त्यामुळे काम सुरू असलेल्या तलावात पुन्हा कालव्याचे पाणी साठविण्यात आले. आता तलावात सतत पाणी असल्याची ओरड ठेकेदाराकडून होत आहे. त्यामुळे साठवण तलावाचे काम पूर्ण होत नाही. तलाव रिकामा करून दिल्यास लवकरच काम पूर्ण होईल, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. वास्तविक, या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. ठेकेदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केलेल्या मागणीप्रमाणे वाढीव निधीलादेखील नगरपालिकेने मंजुरी दिली आहे. तरीदेखील काम रखडले आहे. (प्रतिनिधी)