शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

"...म्हणून रात्रीऐवजी पहाटे पाणी सोडलं"; अजित पवारांनी सांगितलं पुण्यातल्या पुराचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 13:01 IST

पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून अनेक भागात पाणी साचलं आहे.

Pune Heavy Rain :पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पु्ण्या्च्या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्याच्या नदीकाठच्या भागात अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पुण्यात रात्रभर पावसाची संततधार असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषद घेत अतिवृष्टीबद्दल माहिती दिली.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत खडकवासला धरण परिसरात हंगामातील विक्रमी पाऊस झाला. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हे धरण ओवरफ्लो झाले. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुण्याच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यानंतर एनडीआरएफच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत पाणी सोडण्याचे कारण सांगितलं आहे.

"पुण्यातल्या एकता नगर, निम्बज नगर या भागात पाणी वाढलेलं आहे. काही इमारतींचे पहिले मजले पाण्याखाली गेले आहेत. त्यांना बोटीतून बाहेर काढण्यात येत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या भागात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. बुधवारीच रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर ही धरणे कमी भरली होती. या धरणातून अर्धा काळ पुरेल एवढेच पाणी होतं. खडकवासला धरणाच्या परिसरात आठ इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. पुण्यात जवळपास पाच इंचापर्यंत पाऊस पडला. दोन्ही भागात जोरदार पाऊस झाला. खडकवासा धरणाची क्षमता कमी असल्याने ते लगेचच भरले. तीन टीएमसीपेक्षा अधिक पाणी आल्याने धरणाचे दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे जवळपास ४५ हजार क्युसेक पाणी खडकवासला धरणातून सोडण्यात आलं. पाण्याचा प्रवाह सोडत असताना आम्ही ते पहाटे सोडण्याचा निर्णय घेतला. रात्री सोडले असते सलख भागात पाणी जाऊन लोकांना त्याचा त्रास झाला असता. त्यामुळे पहाटे पाणी सोडल्यानंतर आतापर्यंत ते बंडगार्डन पर्यंत पोहोचलं आहे," अशी माहिती अजित पवारांनी दिली. 

१८ ठिकाणी एनडीआरएफची पथके

"हवामान खात्याने पुढील पाच दिवसांचे अंदाज वर्तवले आहेत. त्यानुसार काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर काहींना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास संबंधित ठिकाणी मदत व बचावकार्यासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबईतील कुर्ला व घाटकोपर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली अशा जिल्ह्यांमध्ये एकूण १८ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके, तसेच ६ राज्य आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली आहेत," असेही अजित पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारRainपाऊस