शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

अधिकारी निवडणुकीत गुंतल्याने पाणीटंचाई निवारणाला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 23:25 IST

गावांची होरपळ सुरूच : रुग्णालय, शाळांमध्ये नागरिक, विद्यार्थ्यांचे हाल

दौंड : दौंड तालुक्यात बहुतांशी भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि पदाधिकारी गुंतलेले असल्याने टंचाई निवारणाकडे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती आहे. तर, काही भागांत पाणीटंचाई दूर करण्यासाठी अधिकाऱ्याकडून विलंबदेखील होत आहे.

दौंड शहर आणि ग्रामीण भागात पाण्याची टंचाई जाणू लागली आहे. दौंड शहरातील काही भागात कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे पाणीटंचाई आहे. तर दुसरीकडे, ग्रामीण भागातील तलाव आटल्याने ठिकठिकाणी पाणीटंचाई सुरू आहे. पाटस येथे आठ दिवसांपासून पाणीटंचाई आहे. अशीच परिस्थिती इतर गावांत आहे. त्यामुळे जनतेच्या पाणीप्रश्नावर राजकीय पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी शासकीय कामकाज म्हणून निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. तेव्हा पाणीप्रश्नावर आलेले प्रस्ताव प्रलंबित आहेत. शासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी या दोघांच्या संगनमताने जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत ग्रामपातळीवर कामकाज सुरू असते. मात्र, अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी यांचा मेळ बसत नसल्याने पाणीप्रश्नासंदर्भात आलेल्या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने बहुतांशी भागात पाणीटंचाई सुरू आहे. पाणीप्रश्नावर आणीबाणी आली, तर तेथे तातडीने पाणीप्रश्न सोडविला जात आहे.४दौंड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाण्याची टंचाई लक्षात घेता, तातडीने रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने टँकर सुरू करण्यात आला. असाच निर्णय ग्रामीण भागातील पाणीटंचाईबाबत घेणे गरजेचे आहे.४सध्याच्या परिस्थितीत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे बहुतांशी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी सदस्य निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले आहेत.

टॅग्स :Tapi riverतापी नदीPuneपुणे