शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

भीमा नदीवर ढापे बसविण्यास विलंब

By admin | Published: February 21, 2017 1:51 AM

देऊळगावराजे (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या कोल्हापूर बंधाऱ्यावरील ढापे जलसंपदा विभागाने अद्याप बसवले नाही

देऊळगावराजे : देऊळगावराजे (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या कोल्हापूर बंधाऱ्यावरील ढापे जलसंपदा विभागाने अद्याप बसवले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला दौंडच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.या भागातील शेतकरी नेहमीच दुहेरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात भीमा नदीचे पात्र कोरडे पडले होते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी भामा-आसखेडचे पाणी सोडण्यात आले. परंतु ते पाणी दौड तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतातील गहू, हरभरा, ऊस यांसारखी उभी पिके जळून चालली. या वर्षी पाणी असूनही ढापे न टाकल्याने देऊळगावराजेच्या बंधाऱ्यात दोन अडीच फूट पाणी शिल्लक आहे.पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. येथील शेतकरी सांगतात, फेबुवारी महिना संपत आला तरीसुद्धा अद्याप ढापे टाकले नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यात काही ढापे वाहून गेले आहे आणि त्यातील काही ढाप्यांचे पत्रे निकामी झाले आहेत. त्यामुळे जरी ढापे टाकले तरी त्या ढाप्यातून पाणीगळती चालू राहील. परिणामी पाण्याच्या संदर्भात गेले दिवस पुढे येतील काय, अशी भीती येथील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. तेव्हा संबंधितांनी याकडे लक्ष देऊन वेळीच नवीन ढापे टाकावेत, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.