शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

शिरूर बाजार समितीत सुविधांचा बोजवारा

By admin | Published: May 23, 2017 5:23 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार अस्वच्छतेचे केंद्र असून नियोजनाच्या अभावामुळे तसेच संचालक मंडळाच्या मनमानीमुळे या समितीवर कोणाचे नियंत्रण आहे

प्रवीण गायकवाड । लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर : कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार अस्वच्छतेचे केंद्र असून नियोजनाच्या अभावामुळे तसेच संचालक मंडळाच्या मनमानीमुळे या समितीवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असे चित्र आहे. समितीहितापेक्षा स्वहिताकडे जास्त लक्ष दिल्याने समितीत या समस्येबरोबरच आर्थिक समस्याही निर्माण झाली आहे. समिती शेतकऱ्यांसाठीआहे, मात्र या समितीतून शेतकरी हद्दपार होतो की काय, अशी परिस्थिती आहे. शहरातून गेलेल्या पुणे-नगर रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय, व्यापारी संकुल आहे. पाबळ फाट्याजवळ समितीचे व्यापारी संकुल आहे. जांबूत येथे उपबाजार आहे. पिंपळे-जगताप येथील जागेतही व्यापारी संकुल आहे. शहरातच व्यापारी गाळे, मोकळी जागा मिळून जवळपास ४२५ भोगावटादार आहेत. जांबूत येथे ८० गाळे आहेत. पिंपळे जगतापची जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. समितीच्या सूत्रानुसार समितीला सध्या भाडेपट्ट्याच्यामाध्यमातून सुमारे ३७ लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे. इतरही माध्यमातून समितीला उत्पन्न मिळत असून शासनाच्या विविध योजनांतून विविध कामांसाठी निधी मिळत आहे. असे असताना समिती सध्या तोट्यात आहे. यामुळे की काय जुन्या व्यापारी संकुल (समिती कार्यालय) आवारात घाणीचे साम्राज्य दिसून येते.मोकाट जनावरांचा येथे अड्डा निर्माण झाला आहे. पूर्वी ज्या ठिकाणी शेतकरी निवास होते, त्यांच्या बाजूला प्रचंड घाण असून या घाणीत जनावरे बसलेली असतात.एम. एस. ई. बी. कार्यालयासमोरील गेटच्या आत आल्यावर डाव्या बाजूला प्रचंड घाण आहे. येथेही मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. स्वच्छतागृहात तर पाऊल ठेवणे कठीण जाते, इतके ते अस्वच्छ आहे. आवारातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या समस्या सोडविण्यासाठी कदाचित समितीकडे पैसे नसावेत. समितीच्या आवारात अडत व्यावसायिकांची होलसेल दुकाने आहेत. लीजवर ही दुकाने देण्यात आली आहेत. या दुकानांसमोर व इतरत्र दर शनिवारी आठवडेबाजार भरतो. या दिवशी आलेल्या प्रत्येक शेतकरी, विक्रेत्यांकडून पैसे घेतले जातात. मात्र त्यांना दगडगोट्यात बसावे लागते. पैसे घेतले जात असतील तर त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. मात्र शेतकऱ्यांच्या कोणत्याच प्रश्नांकडे समिती गांभीर्याने लक्ष देत नाही, हे वेळोवेळी दिसून आले आहे. शेतकऱ्यांना राहण्यासाठी विश्रांतीसाठी शेतकरी निवास बांधण्यात आलेले आहे. मात्र हे निवास बंद करून तेथे व्यावसायिकांना जागा देण्यात आली आहे. शेतकरी बाजारासाठी जागा देण्यात आली आहे. मात्र त्याच्या स्वच्छतेकडेही कोणाचे लक्ष नाही. जेव्हा एखाद्या इमारतीत व्यापारी गाळे भाड्याने दिले जातात. तेथे सर्वांकडून मेंटेनन्सचा खर्च घेतला जातो. यातून स्वच्छता व इतर कामे केली जातात. याचप्रकारची अंमलबजावणी बाजार समिती का करीत नाही, हा प्रश्न आहे. ज्या दिवशी बाजार भरतो (आठवडेबाजार) त्या दिवशी संध्याकाळी त्या भागात सफाई केली जाते. मात्र ज्या ठिकाणी कायमची घाण असते, त्या ठिकाणी लक्ष दिले जात नाही. स्वच्छतेसाठी समितीकडे निश्चित तरतूद आहे. मात्र त्याचा वापर का केला जात नाही, हा प्रश्न आहे.