शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

पुण्यासाठी देशातून गाड्यांची मागणी; शहरासाठी 'या' चार रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सुरू - अश्विनी वैष्णव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 10:43 IST

पुणे हे समृद्ध शहर व परिसर असून शैक्षणिक हब बनले आहे, त्यामुळे पुण्यासाठी देशातून गाड्यांची मागणी नेहमी येते

पुणे: शहर आणि परिसराचा वेगाने विकास होत असल्यामुळे येथून लांब पल्ल्याच्या गाड्या वाढविण्याची मागणी वारंवार होत आहे. त्यामुळे पुण्यातील चार रेल्वे स्टेशन विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये उरळी येथे सर्वांत मोठे टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी संसदेत बुधवारी दिली.

अधिवेशनात अनेक खासदारांनी पुण्यातून रेल्वे गाड्या वाढविण्याची मागणी केली होती. यावर बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की, पुणे शहर व परिसर हा एक समृद्ध आहे. पुणे हे शैक्षणिक हब बनले आहे. त्यामुळे पुण्यासाठी देशातून गाड्यांची मागणी नेहमी येते. त्यामध्ये जबलपूर, उत्तर प्रदेश, बिहार या भागातून पुण्यासाठी रेल्वे गाड्या वाढविण्याची मागणी केली आहे. पुण्यातून रेल्वे गाड्या वाढविण्यासाठी तेथील रेल्वे स्टेशनचा विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये चार रेल्वे स्टेशनचा विकास केला जात आहे.

पुणे रेल्वे स्टेशनचे रिमॉडलिंगचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्याबरोबरच हडपसर टर्मिनल, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येत आहे. उरुळी येथे मोठे टर्मिनल विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवासी उतरून ती गाडी पुढे उरुळीला जाईल. त्या ठिकाणीच गाडीची देखभाल दुरुस्ती होईल. ती गाडी पुन्हा पुणे रेल्वे स्टेशनमार्गे प्रवास करील. या स्टेशनच्या विकासामुळे गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल. त्याचा फायदा प्रवाशांना निश्चित होईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वेEducationशिक्षणpassengerप्रवासीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार