शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

लोकशाहीची प्रगती की अधोगती ?

By admin | Published: June 02, 2017 2:52 AM

भ्रष्टाचार, अकार्यक्षमता यामुळे शासकीय यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. माहिती अधिकार कायद्यांतर्गत नागरिकांना माहिती देण्यास

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भ्रष्टाचार, अकार्यक्षमता यामुळे शासकीय यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. माहिती अधिकार कायद्यांतर्गत नागरिकांना माहिती देण्यास यंत्रणा उत्सुक नसते. एखादी योजना प्रस्ताव, समिती स्थापना, मंजुरी या गर्तेत अडकून केवळ कागदावरच राहते. कोणताही भ्रष्टाचार, घोटाळा याबाबत सखोल आणि पारदर्शक चौकशी होत नाही. ही परिस्थिती पाहता लोकशाहीची प्रगती होत आहे की अधोगती, असा सवाल माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांनी उपस्थित केला.संविधानाने आपल्याला दिलेले मूलभूत हक्क व अधिकारांपासून नागरिकांची होत असलेली फारकत या विषयावर आधारलेले अ‍ॅड. दीपक जाधव लिखित ‘वी द पीपल, सब सर्व्हियंट टू पॉवर अँड सिस्टीम’ या पुस्तकाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात खासदार अनू आगा यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. माधव गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड. अश्पाक कादियानी, शिवस्पर्श प्रकाशनचे ज्ञानेश्वर मोळक, अ‍ॅड. शैलजा मोळक आदी मान्यवर उपस्थित होते. शोभा राठोड यांनी सूत्रसंचालन केले.गोडबोले म्हणाले, ‘सरकारी कार्यालयांची दुरवस्था, कर्मचाऱ्यांची उदासीनता याबाबत जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते. अकार्यक्षमता कमी करण्याच्या दृष्टीने सरकारी यंत्रणेमध्ये आणि शासनामध्ये पारदर्शकता येणे नितांत गरजेचे आहे. कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी अद्याप शासनाची मानसिकता बदललेली नाही.’ माहिती अधिकार कायद्यांतर्गत सामान्य नागरिकांना व्यवस्थेला पश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार असतो. परंतु, व्यवस्थेकडून समाधानकारक उत्तरे दिली जातात का, हा संशोधनाचा विषय आहे, असेही ते या वेळी म्हणाले.अ‍ॅड. दीपक जाधव यांनी स्वागत केले. अ‍ॅड. अश्पाक कादियानी यांनी प्रास्ताविक केले. शोभा राठोड यांनी सूत्रसंचालन केले. निकिता जाधव यांनी आभार मानले.अनु आगा म्हणाल्या, ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत देश कचरामुक्त करणे महत्त्वाचे आहेच; मात्र, देशातील व्यवस्था स्वच्छ आणि पारदर्शक होणे जास्त गरजेचे आहे. सिग्नल तोडण्यापासून अनधिकृत बांधकामांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर नियम धाब्यावर बसवले जातात, कायद्यांची पायमल्ली होत आहे. कायद्यांचा आदर केल्यास, त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास अनेक बेकायदेशीर कृत्यांना आळा बसू शकतो. नागरिकांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत मााहिती देण्यास नकार दिला जातो. माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर राजकीय दबाव आणला जातो. व्यवस्थेबद्दल सामान्यांमध्ये विश्वासार्हता वाढीस लागण्यासाठी आमूलाग्र बदल गरजेचे आहेत.’