शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

वणवण थांबली; चारा प्रश्न गंभीरच!

By admin | Published: September 25, 2015 1:23 AM

जूनची सरासरी ओलांडून पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यात सुरू झालेली पाणीटंचाईची झळ आता परतीच्या पावसाने कमी केली आहे.

पुणे : जूनची सरासरी ओलांडून पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यात सुरू झालेली पाणीटंचाईची झळ आता परतीच्या पावसाने कमी केली आहे. श्रावणातही ४९ टँकरने जिल्ह्यात सुरू असलेला पाणीपुरवठा आता २० टँकरवर आला आहे. मात्र बारामतीच्या जिरायती भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.५ जूननंतर जिल्ह्यात मान्सून सक्र्रिय होऊन तो सरासरीच्या १६0.0६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात मेअखेर सुरू असलेले ३२ टँकर झपाट्याने कमी होऊन ते १८ वर आले होते. मात्र, जुलै महिन्यात ५७.0५, आॅगस्ट महिन्यात ३४.६३ इतकाच पाऊस झाल्याने जिल्ह्यात पुन्हा ‘पाणी पाणी रे’ करण्याची वेळ आली. त्यामुळे पुन्हा जिल्हा प्रशासनाने टँकर वाढवून ते ४९ केले आहेत. मात्र, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा पाऊस सुरू झाला. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत जिल्हात १८0.४७ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो टक्केवारीत सरासरीच्या १२३. ५७ इतका आहे. जूनपासून आतापर्यंत ६४२.१७ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, तो टक्केवारीत सरासरीच्या ७५.९३ इतका आहे. अजून २५ टक्के पाऊस कमी झाला आहे. पाणीसाठ्यांतील तूट मात्र चिंताजनकच आहे. (प्रतिनिधी)माळेगाव : पाठ फिरवलेल्या पावसाने जाता-जाता दमदार हजेरी लावली. परंतु, समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्तच आहेत. शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, मोठ्या जनावरांचे काय करावे? असा प्रश्न बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांसमोर आवासून उभा आहे. दरम्यान, चारा छावण्या उभ्या करण्याकरिता सरकारी आदेशानुसार जनावरांच्या सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु शेतकरीवर्गामधून ‘चारा छावण्या नको,डेपो द्या’ अशी मागणी जोर धरू लागली आहे. चारा छावणी झाल्यास लोकांना आपली जनावरे छावणीमध्ये घेऊन जावी लागतात. यामुळे त्याठिकाणी घरातील एक व्यक्ती अडकून पडते. एकीकडे जनावरांचा जीव वाचविण्यासाठी धडपड, तर दुसरीकडे स्वत:चे पोट भरण्यासाठीची वणवण. त्यातच छावणीवर थांबणाऱ्या व्यक्तीसाठी खाण्या-पिण्याची सोय करावी लागते.दूध काढणे व विक्रीची समस्या, जनावरांना साथीच्या रोगांचा होणारा प्रादुर्भाव व इतर येणाऱ्या अडचणी यांमुळे शेतकऱ्यांमधून चारा डेपोची मागणी होत आहे.२०१२ साली चारा डेपो उघडण्यात आले होते. परंतु अडचणी आल्याने तीन महिन्यांमध्येच चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. बारामती तालुक्यातील ६४ ते ६७ गावे दुष्काळसदृश आहेत. पूर्वीसुद्धा ६४ गावांकरिता छावण्या उभारण्यात करण्यात आल्या होत्या. या वर्षीही ज्या गावांची आणेवारी ५० टक्केच्या आत असेल तेथे चारा डेपो किंवा छावण्या उभ्या राहतील. याकरिता जनावरांचा सर्व्हे केला जात आहे. माळेगाव बुद्रुक व माळेगाव खुर्द हा भाग बागायती असल्याने सध्या चाऱ्याची समस्या दिसत नाही. परंतु पाऊस न झाल्यास चाऱ्याची कमतरता निर्माण होईल, असे माळेगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गाडे यांचे मत आहे. (वार्ताहर)