शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पुणेकर, तुम्ही खूप पाणी वापरता! देवेंद्र फडणवीसांची विविध प्रश्नांवर उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 10:07 IST

पुणेकराने पाण्याविषयी प्रश्न विचारला असता....

पुणे :पुणेकर सर्वांत जास्त पाणी वापरतात, अशी तक्रार महाराष्ट्राची आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. तरीदेखील पुणेकरांना पाण्याची टंचाई जाणवते. लवकरच २४ तास पाण्याची योजना सुरू होईल. तिचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होईल. धरणातील पाणी वाचेल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांना एका पुणेकराने पाण्याविषयी प्रश्न विचारला असता ‘तुम्ही खूप पाणी वापरता’ असे बोलून पुणेकरांवर निशाणा साधला, तसेच विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.

प्रश्न : पुण्यात पाण्याची टंचाई?

- पुणेकरांसाठी २४ तास पाणी योजना लवकरच सुरू होईल. त्यामुळे कुठे टंचाई जाणवणार नाही, तसेच एमआयडीसीचे प्रदूषित पाणी नदीत जाते. त्यावर प्रक्रिया करून तेच वापरण्यासाठी सांगणार आहोत. त्यातून नदी प्रदूषित होणार नाही आणि पाण्याचा पुनर्वापरही होईल.

वाहतूक कोंडी प्रचंड, रस्ते मोठे करा?

- नगर रस्ता, नाशिककडे जाणारा रस्ता येथे वाहतूक कोंडी होते. काही ठिकाणी आम्ही इलिव्हेटेड रस्ते करत आहोत. त्याने कोंडी फुटेल. दीड- दोन वर्षांनंतर हा त्रास होणार नाही. पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेचे कामही सुरू होईल.

पुण्यात आयआयटी किंवा आयआयएम का नाही?

- पुण्यातील शैक्षणिक संस्था आयआयटी, आयआयएमपेक्षाही उत्कृष्ट काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयआयटीची संख्या वाढवली आहे; पण सर्वत्र त्या करता येत नाहीत. पुण्यात खूप शैक्षणिक संस्था असून, त्यांच्यात जागतिक स्तरावरील शिक्षणातील एक्सलन्स आहे. म्हणून इथे आयआयटी, आयआयएमची गरजच नाही.

महिला उद्योजकांसाठी रोजगार योजना काय?

- देशातील अनेक मोठ्या महिला उद्योजिका या पुण्यातून वर आलेल्या आहेत. पुण्याचे हे मोठे योगदान आहे. त्यामुळे अजून महिला उद्योजकांसाठी पोषक वातावरण किंवा योजना करायची असेल, तर नक्कीच करू.

पुण्यात विजेचा तुटवडा?

- शेतीची वीज सौरऊर्जेवर नेण्यासाठी प्रयत्न करतोय. कृषीचे ४ हजार मेगावॅट फिडर यावर आणणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज उपलब्ध होईल, ती उद्योगाला देऊ.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWaterपाणीPuneपुणे