शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

'देशात हुकूमशाही पुन्हा डोकावतेय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 01:28 IST

किरण नगरकर : नयनतारा सहगल यांना भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार

पुणे : माणसाकडे विचार करण्याची क्षमता आहे. कोणतीही कृती करण्याआधी, निर्णय घेण्याआधी त्याला परिणामांचा विचार करता येतो. परंतु, सध्या भारतीय लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का, असा सवाल ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी उपस्थित केला. हिटलर गेल्यानंतर तसा माणूस पुन्हा होणार नाही, असे वाटले होते. मात्र, हुकूमशाही अनेक देशांमध्ये पुन्हा डोकावू लागली आहे, हिटलर परत आलाय, अशा शब्दांत त्यांनी परखड टीका केली.

आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनतर्फे भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्यावतीने नगरकर यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकल्यामुळे सहगल यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य, पन्नालाल सुराणा, डॉ. प्राची रावळ, लक्ष्मीकांत देशमुख, जयंत मटकर, प्रा. विलास वाघ, डॉ. नितीन केतकर, प्रा. गीतांजली वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अभिजित वैद्य यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. डॉ. नीलिमा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन केतकर यांनी प्रास्ताविक केले.अल्पसंख्याक दहशतीखाली४व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना सहगल म्हणाल्या, ‘अल्पसंख्याक दहशतीखाली आहेत हे कशाचे लक्षण आहे? तुमच्या श्रद्धांबाबत कोणी प्रश्न उपस्थित केला, की लगेच आपल्या विरोधातला आहे, असे समजून एक तर त्याला ऐनकेन प्रकारे तुमच्या विचारधारेशी जुळवून घेण्यास भाग पाडले जाते.४अन्यथा त्यांचा दाभोलकर, कुलबुर्गी, गौरी लंकेश केला जातो. आमच्यासोबत या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असे वातावरण अनुभवावयास मिळत आहे. अशाने घटनेची पायमल्ली होत आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची तर पदोपदी पायमल्ली होत आहे. शाळा, महाविद्यालय स्तरांपासून बुद्धीभ्रम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. कला-साहित्य-संगीत सर्वच कला सरकारच्या रडारवर आल्या आहेत.नगरकर म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांना सरदार पटेल यांच्याबद्दल काय माहीत आहे? एवढे पैसे खर्च करून पुतळा उभारण्याऐवजी २५ दवाखाने उभारता आले असते. कोणाचा आदर कसा करावा, हे कळत नाही का? इतिहासातील त्यांना जी हवी आणि जशी हवी तीच व्यक्तिमत्त्वे पुढे येत आहेत. मोठमोठे पुतळे उभारून भारत घडणार नाही, तर प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे.’४बाबा आढाव म्हणाले, ‘काल दुपारी मोदींचे भाषण ऐकल्यावर खूप अस्वस्थ वाटले, तेव्हा भाईची खूप आठवण आली. या देशांमध्ये हजारो वर्षात हिंदू दहशतवादाचे एकही उदाहरण नाही, असे म्हणत त्यांनी नथुरामाचे नाव न घेता श्रद्धांजली वाहिली. सध्या लोकशाहीचा नंगानाच चालू आहे. निवडणुकीत धर्माचा, जातीचा वापर केला जात आहे. सरकारविरोधात बोलले, की तो देशद्रोह ठरवून निर्दोष लोक तुरुंगात धाडले जातात आणि खरे गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरतात.’

टॅग्स :PuneपुणेNayantara Sahgalनयनतारा सहगल