शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

संकेतस्थळ बंद पडल्याने गैरसोय

By admin | Published: May 11, 2017 4:51 AM

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या संकेतस्थळाचा सर्व्हर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या योजनेसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या संकेतस्थळाचा सर्व्हर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्जच भरता येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.भारतात कुठेही घर नसलेल्या व्यक्तीला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना आणली आहे. केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेसाठी जानेवारी महिन्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे; मात्र जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात महापालिका निवडणुका असल्यामुळे या योजनेसाठी अपेक्षित एवढे अर्ज दाखल होऊ शकले नव्हते, त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी आता ७ जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. आत्तापर्यंत जवळपास ९० हजार अर्ज प्रशासनाकडे आले आहेत; मात्र या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याचे संकेतस्थळ गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद (डाऊन) पडले आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्जच दाखल करण्यास अडचण येत आहे. हे संकेतस्थळ सेंटर इन्फॉर्म$$ेशन सेंटर येथून चालविले जात आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण देशातील नागरिकांसाठी हे एकच संकेतस्थळ असल्याने ते ‘डाऊन’ होत असल्याचे सांगण्यात आले. ज्या नागरिकांना या योजनेसाठी अर्ज दाखल करायचे आहेत, त्यांमधील बहुतांश जणांना अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे सध्या सर्व्हर डाऊन असल्याने सायबर कॅफेच्या पायऱ्या जिझवाव्या लागत आहेत.