शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

'माझ्या विरोधात उभ्या असणा-या व्यक्तीबरोबर ती म्हणेल त्या वेळेस चर्चा', सुप्रिया सुळेंचे खुले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 11:06 IST

माझ्या विचारांमध्ये पूर्णतः सुस्पष्टता असून मी काँग्रेसच्या विचारधारेत काम करते

इंदापूर : बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक हा भातुकलीचा खेळ करुन टाकला आहे. माझी लढाई वैयक्तिक कुणाशी ही नाही. राजकीय, वैचारिक लढाई आहे. माझ्या विरोधात उभ्या असणा-या व्यक्तीबरोबर ती म्हणेल त्या वेळेस, त्या जागेवर व कोणत्या ही व्यासपीठावर येऊन चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे खुले आव्हान खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि.२२) शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.    संविधानाची अंमलबजावणी जेथे होते ते मंदीर म्हणजे संसद आहे. त्यामुळे तुम्ही बारामतीची निवडणूक हलक्यात घेता, तशी ती हलक्यात घेत नाही. माझ्या विरोधात उभे राहिल हे मला माहिती नाही. त्याचे उत्तर महायुतीच देईल. लोकशाहीत दोन वेगळे विचार मांडण्यात येत आहेत. माझ्या विचारांमध्ये पूर्णतः सुस्पष्टता आहे. मी काँग्रेसच्या विचारधारेत काम करते,असे ही त्या म्हणाल्या.    मराठा, धनगर, लिंगायत ,मुस्लिम भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या खुप वर्षापासूनच्या मागण्या आहेत. आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासन असंवेदनशील आहे. खोट बोल पण रेटून बोल असा प्रकार करत आहे. ट्रिपल इंजिन खोके सरकारची आरक्षणाबाबतची जी भूमिका आहे ती अतिशय फसवी व दुर्देवी आहे. या मध्ये सामान्य माणूस भरडला जातो आहे, असे सुळे म्हणाल्या. दहा वर्षे केंद्रात भाजपची सत्ता आहे. तीनशे खासदार,दोनशे आमदार असे पाशवी बहुमत असताना आरक्षणाबाबत ते कसला ही निर्णय घेत नाही. जरांगे-पाटलांसारखा माणूस आंदोलने करतो. त्यावेळी मंत्री त्यांना भेटायला जातात. मात्र प्रश्न सुटत नाही. सरकार जरांगे व मराठी माणसांची फसवणूक करत आहे. जरांगे यांना सतत आंदोलने का करावी लागतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

  भाजपमध्ये सध्या इनकमिंगला महत्व आहे. तुम्ही भ्रष्टाचार करा लगेच आम्ही आरोप करणार. दुस-या दिवशी तुमचा पक्षप्रवेश घेणार. चौथ्या दिवशी तुम्हाला एक मोठे पद देणार ही त्यांची सध्याची आदर्श पॉलीसी ठरली आहे. 'भ्रष्टाचारमुक्त भारत', 'न खाऊंगा न खाने दुंगा'चे काय झाले देवालाच ठाऊक अश्या शब्दात सरकारचे वाभाडे काढत त्या म्हणाल्या की, विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत मोठी आंदोलने उभारणारे प्रकाश जावडेकर, २०१४ मध्ये भाजप सत्तेत यावा यासाठी याच्यासाठी झटणा-या, खुर्च्या, सतरंजा उचलणा-या माधव भंडारींसारख्या कार्यकर्त्यांना काय मिळाले. ते ज्यांच्याशी लढले ते सत्तेच्या पंक्तीत चांदीच्या ताटात जेवत आहेत. भाजपला सत्तेवर आणण्यासाठी पराकाष्ठा करणा-या गोपीनाथ मुंडे  कुटुंबाकडे लक्ष द्यायला आत्ता सरकारला वेळ नाही. १०५ आमदार निवडून आणणा-या देवेंद्र फडणवीसांनी होते. ४० आमदारांच्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्वच गडकरी मुंडे देवेंद्र फडणवीस या मराठी माणसांचा द्वेष करते असा घणाघात खा. सुळे यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीIndapurइंदापूरSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारण