शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

अतिवृष्टीबाधितांना राज्यात 458 कोटी रूपयांचे वाटप; ८ लाख ५५ हजार २६६ लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 7:24 AM

खरीप हंगामासाठीच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातून ८४ लाख शेतकऱ्यांनी सहभाग  घेतला.

पुणे : पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ४५८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत देण्यात आली. ८ लाख ५५ हजार २६६ शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने आपला या योजनेतील असहकार अजून सुरूच ठेवला असून त्यांनी अद्याप एकाही शेतकऱ्याला पैसे दिलेले नाहीत.

खरीप हंगामासाठीच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातून ८४ लाख शेतकऱ्यांनी सहभाग  घेतला. त्याचे काही हजार कोटी रुपये केंद्र, राज्य सरकारने व शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसात यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यापैकी ३८ लाख ८० हजार विमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे दावे दाखल केले.

अन्य बाधित शेतकऱ्यांनाही लवकर भरपाई 

कृषी विभाग व कंपन्यांनी ३८ लाख ८० हजार शेतकऱ्यांसाठी १ हजार ३७३ कोटी १७ लाख रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केली आहे. रिलायन्स वगळता अन्य ५ कंपन्यांनी आतापर्यंत साडेआठ लाख अर्जदार शेतकऱ्यांना ४५८ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अन्य बाधित शेतकऱ्यांचे दावेही मंजूर असून नुकसान भरपाईचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. 

तक्रारीची दखल अद्याप नाहीच

भारतीय कृषी विमा, बजाज अलायन्स, एचडीएफसी, इफ्को टोकियो, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड या ६ कंपन्यांची केंद्राने राज्यासाठी विमा कंपनी म्हणून नियुक्ती केली आहे. रिलायन्स वगळता सर्व कंपन्यांनी पैसे देण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या केंद्रीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कृषी आयुक्तांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीबाबत लेखी तक्रार केली आहे, मात्र त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. 

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र