शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

सन्मानाने दिलेले फेटा, पागोटे आणि पगडी काढणार नाही : विक्रम गोखले यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 17:33 IST

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या जाहीर कार्यक्रमातून पुणेरी पगडी हद्दपार करण्याची घोषणा केली होती....

ठळक मुद्देचित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणार असल्याची विक्रम गोखले यांची घोषणा

पुणे : आज सन्मानाने दिलेली शाल, फेटा, पागोटे आणि पगडी आहे. ते मुळीच काढणार नाही. हा खूप मोठा सन्मान आहे अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘पुणेरी पगडी’ वरून उदभवलेल्या वादावरून अप्रत्यक्षपणे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना टोला लगावला. संगीत रंगभूमीवरील बालगंधर्वांसारख्या मोठ्या कलाकाराच्या नावाने मिळालेला पुरस्कार आणि ज्या वास्तूला त्यांचे नाव दिले आहे, त्या रंगमंचावर काम करण्याची मिळालेली संधी या आनंदाच्या क्षणाने खूप हळवा झालो आहे..आवाज बसल्याने या चोवीस फूटाच्या पवित्र भूमीत पुन्हा येऊ शकणार नाही..याचीच खंत वाटते असे सांगताना गोखले गहिवरले. बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये नाट्य-चित्रपटसृष्टीतील सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, नाटककार-पटकथालेखक अभिराम भडकमकर, बालगंधर्व परिवारचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अमर परदेशी आणि बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक प्रकाश अमराळे उपस्थित होते.गोखले म्हणालो, गोवा नाटक कंपनीसाठी काम करत असताना नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर अनेकदा समुद्र किना-यावर एकटाच जायचो. तो उसळलेला समुद्र पाहून या समुद्राने आता आपल्या कवेत घ्यावे असे वाटायचे. तसेच या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये रात्रीचा प्रयोग झाल्यावर एक अंधार पसरतो. केवळ एकच दिवा लागलेला असतो. त्या दिव्याखाली बसून मी नाट्यगृहातील समोरचा अंधार बघतो. त्या अंधाराशी बोलावसं वाटते आणि त्या अंधाराने आपल्या कुशीत सामावून घ्यावे अशी हळवी भावना गोखले यांनी व्यक्त करताच सभागृह नि:शब्द झाले. आवाजाने साथ सोडल्याने १० जानेवारी २०१६ रोजी रंगमंचावरून एक्झिट जाहीर केली. आता पुन्हा रंगमंचावर येणे होणार नसले तरी अभिराम भडकमकर याने एक सुंदर स्क्रिप्ट लिहिले आहे. सध्याच्या डिजिटल युगात संवादापासून दूर गेलो आहोत खूप अप्रतिम कथा आहे. त्या विषयावरच्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणार असल्याची घोषणा गोखले यांनी केली. बालगंधर्व या नावाशी सुबोध भावे याच्यामुळे माझे नाते जडले. ‘बालगंधर्व’  चित्रपट करून ते सारे मोकळे झाले असले तरी बालगंधर्व या सुरेख, मनोहारी आणि सखोल अशा निबिड अरण्यातच मी अडकून पडलो, असे भडकमकर यांनी सांगितले. बालगंधर्व हा विषय एका चित्रपटात मावणारा नाही या भावनेतून ‘असा बालगंधर्व’ या कादंबरीचे लेखन झाले. त्याच्या हिंदी अनुवादाचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विट्ठल जाधव, प्रवचनकार तुळशीराम बुरटे, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, अमोल पावनगडकर, डॉ. श्रीमंत पाटील, जादूगार विजय रघुवीर आणि जितेंद्र रघुवीर, ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री तारे, अभिनेते दीपक रेगे, चिन्मय जोगळेकर यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. उल्हास पवार यांनीही रंगभूमीवरच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चोरडिया आणि पराग यांनी केले. 

टॅग्स :PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरVikram Gokhaleविक्रम गोखलेSharad Pawarशरद पवार