शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कारवाई करू नका

By admin | Published: November 10, 2015 1:43 AM

वाहतूक पोलिसांना टार्गेट देऊन रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची पद्धत चुकीची असून, लक्ष्याधारित कारवाई त्वरित थांबविण्याचे आदेश पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दिले़ रिक्षा

पुणे : वाहतूक पोलिसांना टार्गेट देऊन रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची पद्धत चुकीची असून, लक्ष्याधारित कारवाई त्वरित थांबविण्याचे आदेश पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दिले़ रिक्षा पंचायतीच्या शिष्टमंडळाने रामानंद यांची भेट घेऊन याबाबत वस्तुस्थिती दाखवून दिल्यानंतर त्यांनी हा आदेश दिला़ याबाबत रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी सांगितले, की गेले जवळपास महिनाभर अ‍ॅटो रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम वाहतूक पोलिसांकडून चालू आहे. काही रिक्षाचालकांकडून प्रवाश्यांना दिला जाणारा नकार हा नोंद घ्यावी इतक्या प्रमाणात येणारा अनुभव आहे. नकार देऊ नये, याबाबत संघटना म्हणून पंचायत सातत्याने विविध प्रयत्न करीत असते़ पोलिसांकडून सध्या सुरू असलेली कारवाई म्हणजे रोगापेक्षा इलाज जालीम, असा अनुभव देणारी होत आहे. तशा तक्रारी काही जबाबदार रिक्षाचालकांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्याविषयीचे अनुभव दिवाळीच्या तोंडावर पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांच्यापुढे शिष्टमंडळाने मांडले़ ही चुकीची पद्धत असून, अशी लक्ष्याधारित कारवाई थांबविण्याच्या आदेशाच्या सूचना दिल्या. रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांच्यासह शिष्टमंडळात शैलेश गाडे, रावसाहेब कदम, महेंद्र सतुर, अब्दुल सतार, सिद्धार्थ चव्हाण यांचा समावेश होता.वाहतूक पोलिसांना कारवाईच्या संख्येचे लक्ष्य दिले जाते. ते पूर्ण करण्यासाठी खऱ्याबरोबरच खोट्या कारवाया करून लक्ष्य पूर्ण केले जाते, असा रिक्षाचालकांचा आरोप. पोलीस सहआयुक्त रामानंद यांच्या लक्षात आणून देण्यात आल्यानंतर अशी लक्ष्याधारीत कारवाई त्वरित थांबविण्याचे आदेश त्यांनी दिले.ऐन दिवाळीत नियमाने प्रवासी नेणाऱ्या रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिक्षाचालकांसह दुचाकीचालकांनाही अशाच लक्ष्याधारित कारवाईचा सामना करावा लागत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.