शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जेजुरीत सालाबादप्रमाणे यंदाही भरला गाढवांचा बाजार, बाजाराला उतरती कळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 18:53 IST

जेजुरीत भरणारी पौषपौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी (खरेदी -विक्री ) पुरातन काळापासून प्रसिध्द आहे .

ठळक मुद्देविविध जातींच्या गाढवांची खरेदी विक्री

जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार पौषपौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. बाजारात विविध जातींच्या गाढवांची खरेदी -विक्री होत असली तरी ही गाढवांची संख्या कमी होती. केवळ ५०० गावठी व काठेवाडी जातीच्या गाढवांची खरेदी विक्री झाली. जनावरे कमी आणि व्यापारी जास्त यामुळे जनावरांना मोठी मागणी राहिल्याने चढया भावात विक्री होत होती. यामुळे लाखोंची बाजाराची उलाढाल झाली. 

जेजुरीत भरणारी पौषपौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी (खरेदी -विक्री ) पुरातन काळापासून प्रसिध्द आहे . जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवून गडाच्या पायथ्याला असलेल्या बंगाली पटांगणात शेकडो वर्षापासून येथे राज्यातून व राज्याबाहेरून गावगाड्यातील आलेला बाराबलुतेदार परंपरेतले विविध जातींचे समाजबांधव गाढवांची खरेदी -विक्री करतात. या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये प्रामुख्याने राजस्थान ,गुजरात कर्नाटक ,आंध्र या राज्यासह महाराष्ट्रातील सातारा ,सांगली ,कराड ,बार्शी ,नगर ,बारामती ,पुणे फलटण, जामखेड ,आदी ठिकाणांवरून वैदू ,वडारी , कैकाडी ,बेलदार (पाथरवट ) आदी समाजबांधव येथे विविध जातींच्या गाढवासह दाखल होतात. गाढवांच्या खरेदी -विक्री बरोबरच देवदर्शन -कुलधर्म -कुलाचार आदी धार्मिक कार्यक्रम येथे होतात.

पूर्वीच्या काळी गाढवांचा वापर जड मालाच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असे. आजच्या यांत्रिक युगामध्ये ओझे वाहण्यासाठी गाढवांचा वापर कमी झाला असल्याने गाढवांची संख्या कमी कमी होऊ लागली आहे. यंदा केवळ ५०० विविध जातींची गाढवे जेजुरीच्या बाजारात दाखल झाली होती. विशेषतः राजस्थानी —काठेवाडी जातीची  ७५ जनावरे होती. या गाढवाला सर्वात जास्त २५ ते ४० हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. तर गावरान,गावठी गाढवाला १० ते २५ हजार रुपये भावाची बोली लागत होती. राजस्थानी -काठेवाडी गाढव पांढरेशुभ्र असेल तर कर्नाटक -आंध्र येथून आलेले व्यापारी भावांमध्ये घासाघीस करताना दिसून येत होते.पूर्वीच्या काळी गारुडी ,कुंभार,परीट समाजबांधवही बाजारात दिसून येत असे आता मात्र फक्त मोजकेच समाजबांधव खरेदी -विक्री करताना दिसतात.गाढवांच्या दातावरून त्याचे वयाचे अनुमान काढले जाते.

दोन दातांचे दुवान हे गाढव तरुण मानले जाते. चार दातांचे चौवान हे मध्यमवयीन ,तर कोरा म्हणजे नुकतेच वयात येणारे असे अनुमान काढत त्यांचे दर ठरवले जातात.रंगावरूनही किमत करण्यात येते.पांढऱ्या शुभ्र जनावराला चांगला दर मिळतो.त्यानंतर गडद जांभळा ,तपकिरी लालसर,करडा अशा रंगाच्या प्रतवारीनुसार दर आकारले जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पूर्वीच्या काळी येथील बाजारात व तीन ते चार दिवस चालणाऱ्या यात्रेत गाढवांच्या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून लाखोरुपयांची उलाढाल होत असे. परंतु सध्या परिस्थिती तशी राहिली नाही.केवळ वाडवडिलांनी घालून दिलेली येथील परंपरा जोपासण्यासाठी ही यात्रा करावयाची असे काही समाजबांधवांनी सांगितले. मात्र आजच्या यांत्रिक युगात, औद्योगिकीकरणामुळे गाढवांचा वापर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांची संख्या ही कमी होत आहे. गेल्या वर्षी एक हजार गाढवांची संख्या होती, यावर्षी ही संख्या निम्म्याने कमी झाली आहे. 

टॅग्स :Jejuriजेजुरी