शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

या बंडामागे शरद पवार असण्याची शंका, राज ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 19:31 IST

पुण्यातील प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी आले असताना राज यांनी पत्रकारांबरोबर बोलताना राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं

पुणे - राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते किळसवाणे आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही घरात जावा तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील, एवढी चीड जनतेला या राजकारणाची आली आहे, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यातील बंडखोरीच्या राजकारणावर मत व्यक्त केलं. तसेच, घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं काहीच समजत नाही. मात्र, हे काही अचानक घडलेले नाही तर फार आधीपासून ठरत होतं, अशी टीकाही राज यांनी केली. तर, या बंडामागे शरद पवारांचाच हात आहे, असेही राज यांनी म्हटले. यावेळी, तीन वरिष्ठ नेत्यांची नावे त्यांनी घेतली.  

पुण्यातील प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी आले असताना राज यांनी पत्रकारांबरोबर बोलताना राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. या सर्व किळसवाण्या गोष्टी आहेत. अशा गोष्टी अचानक होत नाहीत. हे सगळे फार आधीपासून प्लॅन केलेले असणार. प्रफुल्ल पाटील, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे हे अजित पवार यांच्याकडे जाणाऱ्यांतले नाहीत. हे तिघे अजित पवारांसोबत गेल्यामुळे शंका येते. शरद पवार यांच्याबरोबरची ही माणसे अचानक उठतील व अजित पवारांना साथ देतील असे होणार नाही. त्यामुळे या सर्व घडामोडींमध्ये शंकेला जागा आहेत. जे झाले त्यात शरद पवार यांचा हात असण्याची शक्यताही राज यांनी व्यक्त केली. उद्या खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही, या आपल्या वक्तव्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.

सध्या कोण कुठे आहे ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांबाबत सांगता येईल, बाबू वागसकर कुठे आहेत तर ते मनसेत आहेत असे सांगता येते, बाकी कोण कुठे, कोणाबरोबर आहे हे सांगणे अशक्य आहे. कॅरम एकदम कसा तरी फुटला आहे, कोणाची गोटी कोणाच्या भोकात असे सांगता येणार नाही असे राज यांनी म्हटले. यासंबधी आपण लवकरच आयोजित मनसेच्या मेळाव्यात सविस्तर बोलू असेही स्पष्ट केले. राज यांच्याबरोबर यावेळी मनसेचे बाबू वागसकर तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारprafull patelप्रफुल्ल पटेल