शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

डॉ. अमोल कोल्हेंची कामगिरी दमदार, लोकसभेतील ३ ऱ्या क्रमांकाचे खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 3:18 PM

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर त्यांतील आमदार आणि खासदारही दोन गटात विभागले गेले आहेत. अजित पवार आणि ...

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर त्यांतील आमदार आणि खासदारही दोन गटात विभागले गेले आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेृत्त्वातील दोन गट राष्ट्रवादीची धुरा सांभाळत असून सुप्रिया सुळेंसह खासदार अमोल कोल्हे हेही शरद पवार गटात आहेत. अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या खासदार कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर, बंडखोर नेत्यांविरुद्ध भाषणातून आवाजही उठवला. त्यामुळे, सध्या अमोल कोल्हे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, आता वेगळ्याच कारणानं त्यांचं कौतुक होतंय. 

लोकसभेत यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रथमच खासदार बनून निवडून गेलेल्या खासदारांच्या कामगिरीचा आढावा एका सर्वेक्षणातून घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणात राष्ट्रवादीचे खासदार आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी डॉ. अमोल कोल्हे यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचं समोर आलं आहे. या यादीत खा. अमोल कोल्हेंचा देशात तिसरा क्रमांक आला आहे.  

१७ व्या लोकसभेत एकूण २७० खासदारांनी प्रथमच संसदेत एंट्री केली. त्यामध्ये, शिरुर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हेही आहेत. मात्र, या २७० खासदारांमध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीत काँग्रसेच खासदार कुलदीप राज शर्मा यांचा पहिला क्रमांक असून त्यांना ८६४ गुण आहेत. सुकांता मुजामदार यांचा दुसरा क्रमाक लागतो, त्यांना ५८८ गुण आहेत. तर, ५५४ गुणांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा तिसरा क्रमांक आहे. त्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हेंचं अभिनंदन केलंय. त्यावर, प्रतिक्रिया देताना, तुमच्या मार्गदर्शनामुलेच हे शक्य झालं, तुमचंही मोठं योगदान असल्याचं सुळेंनी म्हटलं. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ट्विट करुन खासदार कोल्हे यांचं अभिनंदन केलंय. 

लोकसभेवर प्रथमच निवडून गेलेल्या खासदारांमध्ये अतिशय उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या सदस्यांत देशात तिसरा क्रमांक पटकाविल्याबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांची हि कामगिरी आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलंय. 

भाषणातून फडणवीसांवर निशाणा

सध्याची ही लढाई ही अधर्माची आहे. महाभारताचा विचार करतो, तेव्हा हाच तो शकुनी मामा आहे, ज्याच्यामुळं महाभारत घडलं. आपण विरोधात असलं तर त्याला कौरव म्हणतो. त्याची संख्या कमी असते त्याला पांडव म्हणतो. त्यापलीकडे जाऊन संस्कृती अशी होती, की काही आक्रमण आलं तर कौरव पांडव भाऊ होते, ते एकत्र येऊन मुकाबला करत होते. मात्र, त्यात मिठाचा खडा कोणी टाकला तर तो शकुनी मामा याने. आता हा शकुनी मामा कोण? असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेlok sabhaलोकसभाMember of parliamentखासदारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळे