शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

वीसगाव खोऱ्यातील गावांत धोमचे पाणी पोहोचेना

By admin | Published: May 12, 2017 4:43 AM

भोरच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात सोळा गावांचा समावेश होतो. या गावांच्या माथ्यावर धोम (ता़ वाई) धरण असून, याचे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेरे : भोरच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात सोळा गावांचा समावेश होतो. या गावांच्या माथ्यावर धोम (ता़ वाई) धरण असून, याचे पाणी वीसगाव खोऱ्याला मिळण्यासाठी धोम-बलकवडी डावा कालवा पाच वर्षांपूर्वी डोंगर पोखरून काढण्यात आला़ मात्र, या पाण्याचा उपयोग वीसगावच्या पश्चिमेकडील गावांना होत असून, वीसगावाना पाणी असूनही ते मिळत नसल्याने ‘पाणी उशाला अन् कोरड घशाला’ अशी झाली आहे़धोम-बलकवडी डावा कालवा आंबवडे खोऱ्यातील चिखलगाव व कर्नावड गावच्या शेजारील दोन डोंगर फोडून वीसगाव खोऱ्यातून पश्चिमेकडे नेलेला आहे़ या पाण्याचा येथील शेतकऱ्यांना पाणी परवाना मिळाला नसल्याने उपयोग होत नाही़ या कालव्याला गोकवडी येथील उंबरीची ओव्होळ येथे मोठ्या प्रामाणावर गळती आसल्याने कालव्या खालील अनेक शेतकऱ्यांची दहा ते पंधरा एकर शेती नापीक झाली आहे़ हा कालवा पाले, पळसोशी, वरवडी, आंबाडे, नेरे, बालवडी या गावांशेजारून गेला आसला, तरी बारामाही या गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ यातील काही गावांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे़ धोम-बलकवडी धरणाचे आवर्तन सोडले तरी ही गावे उंचवट्यावर असल्याने पिण्याचे पाणी मिळत नाही़ या उन्हाळ्याच्या दिवसात या गावांची अतिशय गंभीर स्थितीती असून, पाण्यासाठी महिलांना, नागरिकांना दूरपर्यंत पायपीट करावी लागते.कालव्या खालील गावांना तुरळक प्रमाणात पाणी मिळत असते़ या परिसरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी वीसगाव खोरे पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे़