शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पीएमपीचे ठेकेदारांकडील चालक संपावर

By admin | Updated: June 30, 2017 04:10 IST

पुणे महानगर परिवहन (पीएमपी) मंडळाला भाडेतत्त्वावर बस पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांच्या चालकांनी गुरुवारी अचानक संप पुकारला.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे महानगर परिवहन (पीएमपी) मंडळाला भाडेतत्त्वावर बस पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांच्या चालकांनी गुरुवारी अचानक संप पुकारला. पीएमपीकडून कंपनीला होणारा दंड चालकांकडून वसूल करण्याच्या कंपनीच्या धोरणाविरोधात हा संप पुकारण्यात आला. पीएमपीला कसलीही पूर्वसूचना न देता पुकारण्यात आलेल्या या संपामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागला.पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ६५३ बस खासगी कंपन्यांकडून घेतलेल्या आहेत. एकूण ५ ठेकेदारांनी या बस पुरवल्या आहेत. या बस थांब्यावर थांबत नसतील, तर त्यांना दंड करण्याचा निर्णय व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. त्यासाठी त्यांनी बसवर जीपीएस यंत्रणा बसवली आहे. त्यातून त्यांना थांब्यावर कोणती बस थांबली नाही, हे लक्षात येते. या पद्धतीमुळे गेल्या काही महिन्यांत कंपन्यांना फार मोठ्या प्रमाणावर दंड झाला आहे. मात्र, त्याचमुळे बस थांब्यावरच थांबण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.हा दंड चालकांकडून वसूल करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला. चालक बस थांब्यावर थांबवत नाहीत; त्यामुळे दंडाची जबाबदारी त्यांचीच आहे, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे जीपीएस यंत्रणेत त्रुटी असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. मात्र, चालक म्हणून मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत दंड करणे म्हणजे आर्थिक पिळवणूक आहे, असे चालकांचे म्हणणे आहे. ते त्यांनी ठेकेदारांकडे मांडण्याऐवजी थेट संपच पुकारला. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील सार्वजनिक वाहतूकव्यवस्था विस्कळीत झाली. दुपारी ३ वाजता संप सुरू झाला.संपाची माहिती मिळताच मुंढे यांनी तत्काळ पर्यायी व्यवस्था सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. सायंकाळी गर्दीच्या वेळेस ते स्वत: पुणे स्टेशन व अन्य काही गर्दीच्या मार्गांवर फिरत होते. गेल्या काही महिन्यांत पीएमपीच्या मालकीच्या जादा बस रस्त्यावर आल्या आहेत. त्याचाही त्यांना फायदा झाला. १ हजारापेक्षा जास्त बस संपानंतरही मार्गांवर होत्या. ठेकेदारांच्या बस बीआरटी मार्गांवरून धावणाऱ्या आहेत. मुंढे यांनी पीएमपीच्या मालकीच्या बस बीआरटीच्या बाहेरून सुरू केल्या. त्यामुळे प्रवाशांची अडचण कमी होण्यास मदत झाली.चालकांनी बस बंद ठेवल्या यासंबंधी ट्रॅव्हलटाइम कार रेंटल कंपनीचे मंदार हिंगे यांनी सांगितले, की जीपीएस यंत्रणा बरोबरच आहे, असे समजून प्रशासन दंड करीत आहे. हा दंड अवाजवी आहे. तो जमा करणे कंपनीलाही परवडणारे नाही. त्यामुळे चालकांकडून काही प्रमाणात दंड आकारण्याबाबत विचार सुरू होता. तसे होण्याच्या भीतीने चालकांनी बस बंद ठेवल्या. प्रशासनाने या यंत्रणेचा विचार केला पाहिजे.