शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

Supriya Sule: केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्यांचं दिवाळं काढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 8:46 PM

केंद्र सरकारच्या ढसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे यंदा सण साजरा करताना सर्व सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार

धनकवडी : कोरोना महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून या संकटातून अर्थव्यवस्था सावरली असली तरी वाढत्या महागाईने ऐन दिवाळीत सर्वसामान्यांचे दिवाळं काढलं आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे यंदा सण साजरा करताना सर्व सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे. हे सरकार देशात आणखी काही काळ राहिले तर आपल्या मुलांना दिवाळीचा फराळ मोबाईल मध्ये दाखवावा लागेल अशी टिका खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी केली.

शारदा फौंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने आंबेगाव येथील जांभूळवाडी तलाव परिसरात नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश वनशिव व प्रिया वनशिव यांचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुळे बोलत होत्या.

''संसदेत तरुणांच्या बेरोजगारीचा व महागाईचा प्रश्न मांडणार आहे. महापालिका परत मिळविण्याच्या विचाराने नागरिकांनी येत्या पालिका निवडणुकीत आपला लोकप्रतिनिधी निवडावा असे त्यांनी यावेळी सांगितले.'' 

केंद्र सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे

आर्यन खानकडे  काहीच मिळाले नाही, अशी माहिती समोर आली आहे. जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला २६ दिवस कोठडीमध्ये राहावे लागत असल्यास हा कुठला न्याय? त्यामुळे समाज म्हणून आपण सर्वांनी चिंतन केले पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे. शाहरूख खान हा महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. आम्ही परदेशात जातो तेव्हा बॉलिवूडबद्दल खूप विचारले जाते. अशा चुकीच्या गोष्टीमुळे बॉलीवूडचे आणि देशाचे नाव एखादा अधिकारी चुकीचे काम करीत असल्यास जगभरात बदनाम होते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार