शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

गोड बातमी; साखर होणार स्वस्त, कारखान्यांना बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 10:07 AM

केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ साखर निर्यातीवर निर्बंध घातले...

पुणे : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घातल्याने स्थानिक बाजारपेठेत साखर किमान दोन रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे ग्राहक सुखावणार असला तरी साखर कारखान्यांना याचा काही प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे. दुसरीकडे देशातून सुमारे ९५ लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य होते. ती आता जास्तीत जास्त १०० लाख टन होईल. त्यामुळे निर्यातबंदीचा फारसा परिणाम होणार नाही, असे साखर आयु्क्तालयाचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे १०० लाख टन साखर निर्यातीचा कोटा संपल्यानंतर पुढील निर्यातीस केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत देशातून ८५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. त्यापैकी ७५ लाख टन साखर यापू्र्वीच निर्यात झाली आहे. उर्वरित १० लाख टन साखरेचे करार पूर्ण होऊन ती जहाजांमध्ये पोहोचली आहे किंवा त्या स्थितीत आहे.

आतापर्यंत निर्यातीला फायदा

यंदा विक्रमी साखर निर्यात झाल्याने साखर कारखान्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला दर मिळत होता. त्यातच साखर निर्यातीत भारताचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या ब्राझीलमध्येही साखर उत्पादन कमी झाल्याने भारताचा फायदा झाला. आता साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घातल्याने साखर कारखान्यांना फटका बसणार आहे.

कारखान्यांना बसणार फटका

याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक महादेव पाटील म्हणाले, “आता कुठे साखरेला चांगला दर मिळत होता. साखर निर्यातीवर निर्बंध आल्याने कारखान्यांचे विक्रीचे गणित बिघडेल. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेत होईल. येत्या चार-पाच दिवसांत दर कमी होतील यात शंका नाही. सध्या कारखान्यांना ३५०० रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. तो किमान दोनशे रुपयांनी कमी होईल. त्यामुळे ग्राहकांना दोन रुपयांनी साखर स्वस्त मिळेल.

अशी आहे आकडेवारी

भारतातून निर्यात झालेली साखर : ८५ लाख टन

आणखी निर्यातीची शक्यता : १५ लाख टन

आतापर्यंतच्या निर्यातीतील महाराष्ट्राचा वाटा : ५६ लाख टन

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने