शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

वाहतुकीमुळे रस्त्याची लागली वाट

By admin | Published: October 12, 2016 2:37 AM

तालुक्यातील उजनी जलाशय क्षेत्रातील गेले सहा महिने अवैध वाळू वाहतुकीमुळे प्रमुख जिल्हा मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली

लोणी देवकर : तालुक्यातील उजनी जलाशय क्षेत्रातील गेले सहा महिने अवैध वाळू वाहतुकीमुळे प्रमुख जिल्हा मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या नादुरुस्त रस्त्यामुळे येथील आगारांनी या मार्गावरील बससेवा बंद केली आहे. ‘आधी रस्तेदुरुस्ती, मगच बस सोडणार,’ असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. यामुळे मात्र नागरिकांची गैरसोय होत आहे. लोणी देवकर, वरकुटे (बु) गंगावळण, कळाशी, अगोती १, २ हा प्रजिमा १५९ या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली. या रस्त्यावरून १० ते १५ टन भाराने वाहतूक होणे गरजेचे आहे. परंतु सध्या ४० ते ४५ टन भाराने अवैध वाळू वाहतूक होत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रस्ता पूर्णपणे खचला असून, त्यावरती डांबरही राहिले नाही. परिसरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर विद्यार्थी, शेतमालाची वाहतूक करणारी वाहने, ऊस वाहतूक करणारे ट्रक-ट्रक्टर यांची खूप मोठी वर्दळ असते. वाहनचालकाला वाहन चालविताना कसरत करावी लागते. रस्त्याची अवस्था पाहून इंदापूर आगाराने संभाव्य धोका टाळण्यासाठी या रस्त्यावरील एसटीबस बंद केल्या आहेत. रस्तादुरुस्ती केल्याशिवाय एसटी बस सोडणार नाही, अशी ठाम भूमिका आगाराने घेतल्याने विद्यार्थी, नागरिक यांची गैरसोय झाली आहे. तरी तहसीलदारांनी वाळू चोरांवर कारवाई करावी, सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्त्याची दुरूस्ती करून खडीकरण, मजबूतीकरण व डांबरीकरण करावे, अशी विद्यार्थी, वाहन चालक व ग्रामस्थांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)