शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

जलयुक्त शिवारच्या कामांमुळे या वर्षी टँकर झाले कमी

By admin | Published: May 11, 2017 4:20 AM

दौंडच्या जिरायत पट्ट्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे होऊन साधारणत: २८५८ टीसीएम पाणीसाठा वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : दौंडच्या जिरायत पट्ट्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे होऊन साधारणत: २८५८ टीसीएम पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे तालुक्यात ऐन उन्हाळ्यात टँकरची संख्या घटली आहे. गेल्या उन्हाळ्यात तालुक्यात २८ टँकर सुरू होते. त्यातुलनेत उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असताना तालुक्यात ३ टँकर सुरू असून ४ गावांसाठी ४ टँकरचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी साधारणत: ७ टँकर वाढतील, अशी स्थिती आहे. परिणामी, १८ टँकरची संख्या घटलेली आहे. पडवी, खोर, कुसेगाव या परिसरात सातत्याने टँकर सुरू असायचे; मात्र सध्याच्या परिस्थितीत या गावांना टँकरने पाणीपुरवठा नाही. खडकवासला कॅनॉलवरून ३३ गावांना पाणीपुरवठा होतो, तर भीमा नदीकाठावरच्या ९ गावांना पाणीपुरवठा नदीपात्रातून होतो. त्यामुळे नदीपात्र आणि खडकवासला कॅनॉलला पाणी असल्यामुळे पाणीटंचाई भासत नाही. जिरायत पट्ट्यात काही भागात जलयुक्त शिवाराची कामे होऊनदेखील टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत काही तलाव, ओढे, कोरडे ठणठणीत आहेत. कौठडी, ताम्हाणवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वासुंदे, हिंगणीगाडा, स्वामी चिंचोली या ठिकाणी टँकरची मागणी वाढली आहे. तर, अन्य काही गावांसह वाड्यावस्त्यांवर टँकरची गरज भासेल, असे एकंदरीत चित्र आहे.तेव्हा जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नालाखोदाई, तलाव साफसफाई, चाऱ्या खोदणे इत्यादी कामे झाली असली, तरी ही योजना निसर्गावर अवलंबून असल्याने पाऊस पडला, तरच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाणी आडवा मोहीम यशस्वी होऊ शकते. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चांगली कामे झाली, हे नाकारून चालणार नाही. परिणामी, या योजनेअंतर्गत वाढलेल्या पाणीसाठ्याचा उपयोग काही जिरायत भागात पिण्यासाठी आणि शेतीसाठी झालेला आहे. २०१५-१६ वर्षांत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाला, बंधारा खोदाई, नाला साफसफाई, गाळ काढणे इत्यादी कामे झाली आहेत. ही कामे विशेषत: रोटी, वासुंदे, हिंगणीगाडा, कुसेगाव, कौठडी, खडकी, नंदादेवी, पांढरेवाडी, स्वामी चिंचोली, जिरेगाव, देऊळगावगाडा, वाखारी, खोर, पडवी, यवत, डाळिंब, ताम्हाणवाडी, दापोडी या गावात झालेली आहेत. पावसाचे पाणी बऱ्यापैकी साठवले गेले होते. मात्र, मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमिनीत मुरल्याने काही जिरायती गावांत पाण्याची टंचाई आहे. येणारा पावसाळा जोरदार झाल्यास जमिनीत पाणी मुरण्याचा प्रकार राहणार नाही. परिणामी ओढे, नाले, तलाव यांत पाण्याचा साठा बऱ्यापैकी राहील. त्यानुसार पाणीटंचाईवर मात करता येईल.