शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"काँग्रेसच्या साठ वर्षांच्या तुलनेत आम्ही फक्त दहा वर्षांत तिप्पट कामे केली" नितीन गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 13:57 IST

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, रिंगरोडचे काम पण गतीने सुरू होईल. मुबई-पुणे हायवे झाला त्यावेळीच मी पुढच्या २५ वर्षांचा विचार करायला हवा होता, त्यावेळी चूक झाली...

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मुरलीधर मोहोळ निवडणूक लढत आहेत. मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे तसा प्रचाराचा जोर वाढताना दिसत आहे. मोहोळांसाठी काल (शुक्रवारी) प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा पार पडली. आज भाजप नेते नितीन गडकरी यांनीही भाजपच्या उमेदवारासाठी पुण्यातील नातूबाग मैदानावर प्रचारसभा घेतली. पुण्यात बोलताना ते म्हणाले, अनेक दिवसानंतर पुण्यात येण्याची वेळ आली. आज गिरीश बापट आणि मुक्ता टिळक नाहीत. बापटांसोबत माझे खूप जवळचे सबंध होते. बापट पुण्यातील दोन प्रश्न घेऊन माझ्याकडे आले होते. त्यातील एक विमानतळाचा आणि दुसरा मेट्रोचा. आज दोन्ही प्रश्न मिटले आहेत, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, रिंगरोडचे काम पण गतीने सुरू होईल. मुबई-पुणे हायवे झाला त्यावेळीच मी पुढच्या २५ वर्षांचा विचार करायला हवा होता, त्यावेळी चूक झाली. पण आता पुण्यात रिंगरोड झाल्याने अनेक समस्या सुटतील. शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. पुणे-औरंगाबाद अंतर दोन तासावर येईल. पुणे-नाशिक रस्ता पण लवकरच पूर्णपणे सुरू होईल. निवडणुकीनंतर अनेक रत्याची कामं वेगाने सुरू होतील. पंढरपुरला जाणाऱ्या पालखी मार्गाला भक्ती मार्ग करणार असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले.

आम्ही १० वर्षात अनेक समस्या सोडवल्या-

पुणे शहर हे फास्ट गोईंग सिटी आहे. यासाठी दुसरी सिटी वसवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता मुरलीधर मोहोळ खासदार झाले की त्यांनी हे करावं, असं गडकरी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, ६० वर्ष काँग्रेस काळात समस्या सुटल्या नाहीत तर गंभीर झाल्या, आम्ही १० वर्षात अनेक समस्या सोडवल्या. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा पायाभुत सुविधांन महत्व दिले. सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आज देशातील वस्तू आणि सेवांची निर्यात तीन पटीने वाढली आहे. इथेनॉल पंप सुरू झाले आहेत. देशात अनेक कंपन्यांनी इथेनॉल दुचाकी तयार केल्या आहेत. आज देशात अनेक इलेक्ट्रिक कार, बस आल्या आहेत, असंही गडकरी म्हणाले.

अंत्यसंस्कार ब्राम्हणाकडून का केले?

६० वर्षात काँग्रेसने केलेली कामाची तुलना केली तर आम्ही १० वर्षात केलेली कामे तीन पटीने काँग्रेस पेक्षा जास्त काम केलं आहे, असा दावाही गडकरी यांनी केला. पुढे ते म्हणाले, देशातील सर्वांना हक्काचे घर आणि नोकरी मिळेपर्यंत आम्ही काम करणार. माझ्याकडे आई बाबाच फोटो नाही पण छत्रपती शिवाजी महाराज फोटो आहे. आम्ही एकही मशीद तोडण्याच काम केलं नाही. तुम्ही धर्मनिरपेक्ष होता तर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार ब्राम्हणाकडून का केले? असा सवाल गडकरींनी केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीmurlidhar moholमुरलीधर मोहोळpune-pcपुणे